मोहित कंबोजने सांगितल्याशिवाय जलसंपदा विभागात पानही हलत नाही, अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप

मोहित कंबोजने सांगितल्याशिवाय जलसंपदा विभागात पानही हलत नाही, अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप

जलसंधारण आणि जलसंपदा ग्रामीण भागाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे विभाग आहेत. जलसंपदा विभागात एखाद्या अधिकाऱ्याला फोन केला तर निर्णय मोहितं कंबोज घेतो, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. आज विधानपरिषदेत बोलताना त्यांनी हा आरोप केला आहे.

अंबादास दानवे म्हणाले की, ”दीपक कपूर नावाचे अधिकारी आहेत, ते मोहित कंबोजला सांगितल्याशिवाय पाणी सुद्धा पीत नाहीत. मंत्र्यांना माहित आहे की नाही, माहित नाही. पण मोहित कंबोजने सांगितल्याशिवाय जलसंपदा विभागात पान सुद्धा हलत नाही. कोण आहे हा मोहित कंबोज? ग्रामीण भागात धरणाचे नवीन प्रकल्प, वेगवगेळ्या पाण्याचे प्रश्न असतील या सगळ्याचे निर्णय कंबोज घेतो.”

मोहित कंबोज आणि दिपक कपूर यांचं सगळं संभाषण आणि सीडीआर तपासाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच कंबोज आणि दिपक कपूर एकमेकांशी संवाद केल्याशिवाय महाराष्ट्रातले कोणतेही निर्णय होत नाहीत, असा आरोपही त्यांनी त्यांनी केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;