पोलीस आणि गिरणी कामगारांच्या घरांसाठी आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

पोलीस आणि गिरणी कामगारांच्या घरांसाठी आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

मुंबईतील पोलीस आणि गिरणी कामगारांच्या घरांसाठी शिवसेना विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पीडब्ल्यूडी कर्मचाऱयांच्या वरळी येथील इमारतीबाबत महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयाचाही साकल्याने पुनर्विचार करण्यात यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

मुंबईत विविध ठिकाणी पोलीस वसाहती आहेत. वरळी, कुलाबा, नायगाव, माहीम आणि मरोळ येथील पोलीस वसाहतींची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. हजारो पोलीस कुटुंबीय तिथे जीव मुठीत घेऊन राहत आहेत. त्या वसाहतींच्या तत्काळ दुरुस्तीची आणि पुनर्विकासाची आवश्यकता असल्याकडे आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष वेधले. या वसाहतींचे नूतनीकरण व पुनर्विकासाबाबत लवकरात लवकर बैठक घेण्यात यावी, अशी विनंती आदित्य ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांना केली.

गिरणी कामगार आणि त्यांचे वारस हक्काच्या घरांसाठी अनेक वर्षांपासून आंदोलन करत आहेत. गिरणी कामगारांच्या घरांबाबत तसेच बांधून तयार असलेल्या घरांच्या लॉटरीबाबत सरकारने तत्काळ निर्णय घ्यावा आणि गिरणी कामगारांच्या संघटनांबरोबरही त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करावी, अशीही विनंती यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केली. आदित्य ठाकरे यांनी आज यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान भवनात भेट घेऊन निवेदन दिले. याप्रसंगी शिवसेना उपनेते-आमदार सचिन अहिर आणि आमदार वरुण सरदेसाई हेसुद्धा उपस्थित होते.

वांद्रे शासकी वसाहतीचा प्रश्न अधिवेशनात लावून धरणार

वांद्रे येथील शासकीय वसाहतींमधील रहिवाशांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन पुनर्विकासाबाबत पाठपुरावा करण्याची विनंती केली. वांद्रे शासकीय वसाहतींच्या पुनर्विकासाचा मुद्दा विधिमंडळ अधिवेशनात प्रभावीपणे लावून धरावा, असेही रहिवाशांनी यावेळी आदित्य ठाकरे यांना सांगितले. आदित्य ठाकरे यांनीही त्यांना यासंदर्भात आश्वस्त केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;