Santosh Deshmukh Case – राजीनामा ही आमची मागणी नव्हती, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे; मुंडेंच्या राजीनाम्यावर धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया

Santosh Deshmukh Case – राजीनामा ही आमची मागणी नव्हती, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे; मुंडेंच्या राजीनाम्यावर धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी आज अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. यावर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देखमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजीनामा ही आमची मागणी नव्हती. आम्हाला न्याय मिळावा, असे धनंजय देशमुख म्हणाले.

आमची पहिली आणि शेवटची मागणी हीच आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. माझ्या भावाला एका लोकप्रतिनिधीला ज्या प्रकारे संपवलं गेलं ते जे आरोपी आणि क्रूरकर्मी लोक आहेत, हे अमानवीय कृत्या ज्यांनी केलं त्या लोकांना फाशी झाली पाहिजे. आणि मुख्यमंत्री साहेबांना जो शब्द दिलेला आहे की, शेवटचा माणूस फासावर लटकेपर्यंत कोणालाही सोडलं जाणार नाही. न्यायाच्या प्रतिक्षेत तोपर्यंत आम्ही असणार आहोत. अशी आमची भूमिका होती आणि तीच कायम राहणार आहे. यात पारदर्शक तपास व्हावा, कुणाचा राजकीय दबाव नसावा आणि आम्हाला न्याय मिळावा. राजीनामा ही आमची मागणी नव्हती, असे धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केले.

झालेल्या अडीच महिन्यातलं जे नुकसान आहे, त्याची जबाबदारी कोण घेणार? या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे. ज्या वेळेस भावाची हत्या झाली, तुम्ही यंत्रणा राबवल्या. त्या यंत्रणेवर दबाव आणला. पहिल्या पोलीस यंत्रणेनं काय-काय चुकीची कामं केलेली आहेत. त्यावेळेस तुम्हाला कसं काही समजलं नाही. 6 तारखेला अ‍ॅट्रॉसिटी घेतली असती तर 9 तारखेला खून झाला नसता. तसंच तुम्ही भावाची हत्या झाल्यावर जी गोष्ट करायला हवी होती ती आज केली. मध्यंतरीच्या काळामधलं जे नुकसान आहे. त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल धनंजय देशमुख यांनी उपस्थित केला.

चुकीच्या मार्गाने, काळ धन जमवलेलं आहे. त्याच्यातून लैंगिक शोषण खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. अपहरणं, खून झालेले आहेत. खंडणी खूप मोठ्या प्रमाणात जमा केलेली आहे. यातूनच या सर्व गोष्टी घडल्या आहेत. पैसा हा सर्वस्वी आहे, पद काहीही करू शकतो, या सगळ्या भूमिकेतून यांनी ही सगळी गुन्हेगारी वाढवली आहे. हे सर्वश्रृत आहे. परंतु अशी घटना घडली की एका निष्पाप माणसला यांनी चुकीच्या पद्धतीने संपवलं. मृत्युनंतरही त्याच्या मृतदेहाची विटंबना केली. या क्रूरकर्मी लोकांनी हे सगळं केल्यामुळे उठाव झाला, असे धनंजय देशमुख म्हणाले.

आरोपींचे समर्थक अजूनही फिरताहेत. आम्ही आरोपींचे समर्थक आहेत हे छातीठोकपणे सांगत आहेत. आरोपींचं मनोबल वाढवताहेत. आरोपी सुनावणीलाला आल्यानंतर बाहेर भीतीयुक्त वातावरण तयार करण्यासाठी ग्रुपने थांबताहेबत. हे सगळे सीसीटीव्हीतून आणि पुरावे मुख्यमंत्र्यांपर्यंत गेले आहेत, असेही धनंजय देशमुख यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;