आतिषी शूर्पणखा, केजरीवाल रावण; भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य
दिल्लीचे भाजप आमदार गजेंद्र यादव यांनी शुक्रवारी आम आदमी पार्टीचे संस्थापक अरविंद केजरीवाल व दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिषी मार्लेना यांच्याबाबात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. दिल्ली विधानसभा निवडणूकीची रामायणाशी तुलना करता गजेंद्र यादव यांना आतिषी यांना शूर्पणखा व केजरीवाल यांना रावण म्हटले आहे.
गजेंद्र यादव हे मेहरोली मतदारसंघातून निवडून आले आहेत. निकालानंतर त्यांची मतदारसंघात पहिलीच सभा होत होती. त्यावेळी बोलताना त्यांची जीभ घसरली. ”रामायणात रावणाचा व कुंभकर्णाचा अंत झाला मात्र शूर्पणखा वाचली. तसंच या निवडणूकीत झालं आहे. अरविंद केजरीवाल व मनिष सिसोदीया यांचा राजकीय अंत झाला आहे तर आतिषी या जिंकल्या. त्या शूर्पनाखा आहेत.”, असे गजेंद्र यादव म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List