फक्त कायदे करून महिला सुरक्षित नाही होणार, पुणे बलात्कार प्रकरणी माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांची प्रतिक्रिया
पुण्यातील एसटी स्टॅण्डमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला. यावरून राज्यात खळबळ उडाली आहे. पण फक्त कायदे करून महिला सुरक्षित होणार नाही असे विधान देशाचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले आहे.
चंद्रचूड म्हणाले की, फक्त कायदे करून असे कायदे करून अशा घटना थांबणार नाही, महिलांसाठी जे कायदे केले आहेत त्यांची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे. महिला जिथे कुठे असतील त्यांना सुरक्षित वाटलं पाहिजे. तसेच अशा प्रकरणात योग्य तपास, कडक कारवाई, तत्काळ सुनावणी आणि वेळेत शिक्षा होणे गरजेचे आहे. महिला सुरक्षेसाठी पोलीस आणि न्याय व्यवस्थेची मोठी जबाबदारी आहे असेही चंद्रचूड म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List