ज्या मंत्र्यांनी ओएसडी व पीए म्हणून फिक्सर अधिकाऱ्यांची नावे पाठवली त्यांची नावे जाहीर करा – संजय राऊत

ज्या मंत्र्यांनी ओएसडी व पीए म्हणून फिक्सर अधिकाऱ्यांची नावे पाठवली त्यांची नावे जाहीर करा – संजय राऊत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 16 मंत्र्यांनी त्यांचे ओएसडी व पीए पदांसाठी पाठवलेल्या यादी रोखली आहे. या यादीत कलंकित अधिकाऱ्यांची नावे असल्याने ही यादी रोखण्यात आल्याचे समजते. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं आहे. त्यासोबतच त्यांनी त्या 16 मंत्र्यांची नावे देखील जाहीर करण्याचे आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.

”मुख्यमंत्र्यांनी एका मंत्र्याला दम देताना सांगितलेय काही मंत्र्यांकडून जी यादी आली त्यातले काही दलाल आणि फिक्सर होते. मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की कोणत्या मंत्र्यांनी आपल्या ओएसडी व पीए म्हणून अशांची नावे पाठवली त्यांची नावे जाहीर करा. महाराष्ट्राच्या हितासाठी जाहीर करा. माझ्या माहितीप्रमाणे यातले बहुतांश मंत्री शिंदे गटाकडून आहेत. म्हणजेच अमित शहांच्या पक्षाचे आहेत. मला मिळालेल्या नावांनुसार यातले 13 शिंदेंचे आहेत व 3 अजित पवार गटाचे आहेत. पण अजित पवारांना त्यांच्या मर्यादा आहेत. ते मुख्यमंत्र्यांच्या आदेशांचं पालन करतात. ते पाप धुवायला कुंभमेळ्याला गेले नाही. त्यांना माहित आहे महाराष्ट्रातही अनेक पवित्र नद्या, तिर्थस्थळं आहेत. काही लोकांनी इतकं पाप केलंय, गेल्या अडीच वर्षात पापाचा कडेलोट झाला. ते गेले कुंभमेळ्याला. त्यांचे पीए व ओएसडी होते त्यांना रोखल्याबद्दल व महाराष्ट्राचं संभाव्य नुकसान थांबवल्याबद्दल मी फडणवीसांचं अभिनंदन करतो. आमच्यात राजकीय मतभेद असले तरी राज्याच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांना आम्ही पाठिंबा देतो, असे संजय राऊत म्हणाले.

”महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षात घटनाबाह्य सरकारने आर्थिक अराजक माजवलं होतं. पाचशे कोटींचं टेंडर पाच हजार कोटी पर्यंत पोहचवलं. कंत्राटारांकडून टेंडर निघण्याआधीच पाचशे कोटी घेऊन मोकळं व्हायचं. अशा कामांना देवेंद्रभाऊ फडणवीसांनी रोख लावलाय असं आम्हाला समजलंय. ही महाराष्ट्राच्या तिजोरीची लूट फडणवीसांनी थांबवलीय. हा ठेकेदारीच्या भ्रष्टाचारातून मिळवलेला पैसा आहे, हाच पैसा राजकारणात वापरायचा. भ्रष्टाचाराचा पैसा राजकारणात, राजकारणातून परत भ्रष्टाचार हे जर देवेंद्रजी थांबवत असतील तर ते महाराष्ट्रासाठी उत्तम काम करतायत.असं संजय राऊत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;