जलशुद्धीकरण केंद्राचे काम लटकले; दूषित पाण्याचा पुरवठा, शहापूरकरांना पोटदुखी, उलट्यांचा त्रास

जलशुद्धीकरण केंद्राचे काम लटकले; दूषित पाण्याचा पुरवठा, शहापूरकरांना पोटदुखी, उलट्यांचा त्रास

शहापूर शहरासाठी नव्याने बांधण्यात येत असलेली पाण्याची टाकी आणि जलशुद्धीकरण केंद्राचे काम वर्षभरापासून रखडल्यामुळे शहापूरकरांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. दूषित पाण्यामुळे शहरातील नागरिकांना पोटदुखी आणि उलट्यांसह अन्य आजारांचाही त्रास होत आहे. या दोन्ही कामांचे उद्घाटन माजी केंद्रीयमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते झाले होते. मात्र उद्घाटनाला एक वर्ष पूर्ण होऊनही कामच सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

शहापूर नगरपंचायत हद्दीत 9 लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे 270 दिवस मुदतीत पूर्ण करून देण्याचे कार्यादेश उल्हासनगर येथील कंपनीला देण्यात आले आहेत. मात्र वर्ष उलटूनही सदर टाकीचे बांधकाम होत नसल्याने शहापूरकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे काम वर्षभरात पूर्ण झाले नाही तरी अधिकारी बसून आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेवर 3 एमएलडी कॉम्पॅक्ट जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचे काम बदलापूर येथील माना इलेक्ट्रिक आणि इंजिनीयरिंग सर्व्हिसेस यांना देण्यात आले आहे. या कामाचीही लटकंती झालेली आहे.

तांत्रिक अडचणी दूर करा

शहापुरातील दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पाण्याची टाकी व आरोग्य चांगले राहवे यासाठी फिल्टरेशन प्लाण्ट मंजूर करण्यात आला आहे. नगरपंचायतने कामातील तांत्रिक अडचणी दूर करून येथील पाण्याची टाकी व फिल्टरेशन प्लाण्टचे काम पूर्ण करून शहापूरकराना स्वच्छ व पुरेसे पाणी उपलब्ध करावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विजय देशमुख यांनी केली आहे.

सन 2011 च्या जनगणनेनुसार शहापूर नगरपंचायत हद्दीतील लोकसंख्या 11 हजार 623 इतकी होती. दरम्यान हीच लोकसंख्या 25 हजारांच्या वर गेली असल्याने सध्या सुरू असलेला पाणीपुरवठा अपुरा पडत आहे.

फिल्टरेशन प्लाण्टचे काम नागपूर येथे सुरू असून तो प्लाण्ट मार्च अखेरीस शहापुरात आणून बसवण्यात येणार असल्याचे माना इलेक्ट्रिक सर्व्हिसेसचे व्यवस्थापक मनीष त्रिवेदी यांनी सांगितले.

शहापूरमधील जनतेला मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी 9 लाख लिटर पाण्याची टाकी मंजूर करण्यात आली. परंतु ठेकेदार कंपनीच्या उदासीनतेमुळे शहापूर नगरपंचायत हद्दीतील सुमारे 25 हजारच्या वरील नागरिक शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;