महायुती सरकारमध्ये मागासवर्गीय असुरक्षित, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं वक्तव्य

महायुती सरकारमध्ये मागासवर्गीय असुरक्षित, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं वक्तव्य

महायुतीच्या काळात मागासवर्गीयांवरील अत्याचारात वाढ झाली आहे, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. महायुती सरकारमध्ये मागासवर्गीय असुरक्षित आहेत, असं सुद्धा रामदास आठवले म्हणाले आहेत. सांगलीत माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.

काय म्हणाले रामदास आठवले?

भोरमधील हत्या प्रकरणावर भाष्य करताना रामदास आठवले म्हणाले की, ”आपलं सरकार असूनही दलितांना असुरक्षितता वाटते. या सरकारला आपण इतकं भरभरून मतदान केलं, हे सरकार असूनही दलितांची अशी अवस्था होत असेल तर, हे योग्य नाही. मला वाटतं की, यामध्ये कोणालाही पाठीशी घातलं जाऊ नये.”

ते म्हणाले की, ”आमचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. दलितांना न्याय मिळणार आहे की, नाही? या सरकारमध्ये आम्ही आहोत, या सरकारमध्ये दलितांवर अन्याय होत असेल, तर ही गोष्ट बरोबर नाही.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;