दारुड्या नवऱ्याचा राग मुलांवर काढला, आईने पोटच्या तीन बाळांना विहिरीत ढकलले

दारुड्या नवऱ्याचा राग मुलांवर काढला, आईने पोटच्या तीन बाळांना विहिरीत ढकलले

बिहारमधील समस्तीपूर येथे एका महिलेने नवऱ्यासोबत भांडण झाल्याच्या रागात आपल्या तीन मुलांना विहिरीत फेकले. यात तिनही मुलांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी महिलेला व तिच्या पतीला अटक केली आहे.

सीमा चंदन महत्ता ही तिचा पती चंदनसोबत समस्तीपूरामधील थाहरा गावात राहायची. चंदनला दारूचे व्यसन असल्याने त्यांचे त्यावरून नेहमी वाद व्हायचे. रविवारी देखील चंदन दारू पिऊन आल्याने सीमा व त्याच्यात वाद झाला. त्यानंतर चंदन तिथून निघून गेला, मात्र रागाने धुमसत असलेल्या सीमाने झोपलेल्या तिच्या तिनही मुलांना उचलले व घराजवळील विहिरीत फेकून दिले. यात त्या बाळांचा मृत्यू झाला. या तिनही बाळांची वयं ही 2, 4 आणि 6 अशी होती. सदर महिलेने अद्याप तिचा गुन्हा मान्य केलेला नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;