पारा 37 अंशांवर… होळीआधीच मुंबई तापली ! रखरखाट आणखी वाढणार… रात्रीचा गारवाही ‘गूल’ होणार

पारा 37 अंशांवर… होळीआधीच मुंबई तापली ! रखरखाट आणखी वाढणार… रात्रीचा गारवाही ‘गूल’ होणार

होळी सणापूर्वीच मुंबई शहर व उपनगरांत उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. तापमानात अचानक मोठी वाढ झाली असून पारा 37 अंशांच्या विक्रमी पातळीवर गेल्याने मुंबईकरांना उन्हाचे चटके बसू लागले आहेत. मागील आठवडाभर रात्री वातावरणात गारवा होता. तो गारवादेखील गायब झाला आहे. येत्या दिवसांत रखरखाट आणखी वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शहरात गुरुवारी पाच वर्षांतील फेब्रुवारीतील विक्रमी तापमानाची नोंद झाली. यापूर्वी 2021 मध्ये 36.3 अंश तापमान नोंद झाले होते.

सांताक्रुझमध्ये गुरुवारी कमाल तापमान सरासरीपेक्षा पाच अंशांनी वाढले आणि ते 36.3 अंशांवर गेले. किमान तापमान दोन अंशांची वाढ होऊन पारा 20 अंशांवर गेले.फेब्रुवारी महिना सुरू झाल्यानंतर हवेतील गारवा कमी झाला आहे. केवळ रात्री गारवा होता. बुधवारी रात्रीदेखील उकाड्यात वाढ झाली आणि किमान तापमान सरासरीपेक्षा दोन अंशांनी अधिक नोंद झाले. नंतर दिवसभर मुंबईकरांना उन्हाचे तीव्र चटके सोसत कामाची धावपळ करावी लागली.

मुंबईत कोकण विभागातील सर्वाधिक तापमान नोंद झाले. महाराष्ट्राच्या दिशेने प्रवाही राहणाऱया उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या मार्गात प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यांचा अडसर निर्माण झाला आहे. थंड वाऱ्यांची वाट रोखली गेल्याने मुंबईत उन्हाची दाहकता वाढली आहे, असे हवामान खात्यातील तज्ञांनी म्हटले आहे. कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार, पुढील संपूर्ण आठवडाभर कमाल तापमान 36 अंशांच्या आसपास राहील, तर सकाळी पारा 20 अंशांच्या वर राहील.

राज्यभर होरपळ

मुंबईसह संपूर्ण राज्यभर तापमानाने कमाल पातळी गाठली आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भात तर अक्षरशः होरपळ सुरू झाली आहे. गुरुवारी सोलापूरमध्ये सर्वाधिक तापमान नोंद झाले. त्याचबरोबर मराठवाडय़ातही तापमान 36 अंशांच्या पुढे गेले आहे. विदर्भात अकोला, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ आदी भागांत उन्हाची तीव्रता अधिक वाढली आहे. कोकणातही उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;