हिंदुस्थानला 20 हजार वैमानिकांची गरज
देशाला येत्या काही वर्षांत तब्बल 20 हजार वैमानिकांची गरज भासणार असल्याचे नागरी उड्डाणमंत्र्यांनी सांगितले. आपला देश जगाच्या हवाई उड्डाण बाजारपेठेत अग्रेसर असून दिवसेंदिवस अधिकाधिक प्रगती करत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात वैमानिकांची मोठय़ा प्रमाणावर गरज भासणार आहे, असे नायडू यांनी म्हटले. उड्डाण भवन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुढच्या पाच वर्षांत देशात 50 हून अधिक विमानतळे असतील. तर 10 वर्षांत विमानतळांची संख्या 157 पर्यंत वाढेल, असेही ते म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List