मलायकासोबतच्या ब्रेकअपनंतर लव्ह ट्रँगलबद्दल अर्जुन कपूर स्पष्टच बोलला..

मलायकासोबतच्या ब्रेकअपनंतर लव्ह ट्रँगलबद्दल अर्जुन कपूर स्पष्टच बोलला..

अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचं काही महिन्यांपूर्वीच ब्रेकअप झालं. बॉलिवूडमधील ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक होती. वयातील अंतरावरून या दोघांना खूप ट्रोल करण्यात आलं होतं. या ट्रोलिंगलाही न जुमानता दोघं एकमेकांवर खुलेपणाने प्रेमाचा वर्षाव करायचे. अर्जुन आणि मलायका यांचं ब्रेकअप कशामुळे झालं, यामागचं कारण स्पष्ट झालं नाही. दोघांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. मात्र आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुन ‘लव्ह ट्रँगल’बद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. आगामी ‘मेरे हसबंज की बिवी’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त अर्जुनने ही मुलाखत दिली होती. या चित्रपटात प्रेमातील त्रिकोणाबद्दलची (लव्ह ट्रँगल) कथा दाखवण्यात आली आहे.

या मुलाखतीत अर्जुन म्हणाला, “या परिस्थितीत त्या बिचाऱ्यासोबत जे घडलंय आणि त्याचा भूतकाळ परत येतो कारण तिचा स्मृतीभ्रंश होतो. खऱ्या आयुष्यात अशा परिस्थितीत अडकणं ही मजेशीर गोष्ट नाही. प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास, कोणीच अशा परिस्थितीमध्ये अडकू नये किंवा स्वत:ला अशा दुहेरी अडचणीत आणू नये. हे योग्य आहे असं मला वाटत नाही. मला खात्री आहे की काही लोकांच्या आयुष्यात अशी परिस्थिती येते, जिथे ते दोन लोकांमध्ये अडकतात. पण त्यात काही मजेशीर नसतं. एक ना एक जण दुखावला जातोच. नात्यात राहण्याचा हा काही चांगला मार्ग नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

कॉमेडियन हर्ष गुजरालसुद्धा या मुलाखतीत अर्जुन कपूरसोबत उपस्थित होता. चित्रपटातील भूमिकेविषयी बोलताना त्याने अर्जुन कपूर अजूनही सिंगल असल्याचा खुलासा केला. मलायकासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अर्जुनच्या आयुष्यात दुसरी कोणती मुलगी आली नसल्याचं त्याने स्पष्ट केलंय. “माझ्याबाबतीत हे खरंय की माझ्या खऱ्या आयुष्यातही सिंगल आहे आणि अर्जुन भावाच्या खऱ्या आयुष्यातही तो सिंगल आहे. त्यामुळे आम्ही हे सर्व फक्त चित्रपटासाठी करतोय”, असं तो म्हणाला.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी जवळपास सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ब्रेकअप केला. अर्जुनने एका कार्यक्रमात सर्वांसमोर ‘मी आता सिंगल आहे’ असं म्हटलं होतं. त्यानंतर मलायकानेही अप्रत्यक्षपणे रिलेशनशिपमध्ये नसल्याचं स्पष्ट केलं होतं. ब्रेकअपनंतर जेव्हा मलायकाच्या वडिलांचं निधन झालं, तेव्हा अर्जुन तिचं सांत्वन करण्यासाठी पोहोचला होता. त्यानंतर नुकतीच त्याने मलायकाच्या शोमध्येही पाहुणा म्हणून हजेरी लावली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;