‘महाराजांबद्दल कोणी वाचलं तरी आयुष्य बदलेल, मला तर…’, रायगडावरून विकीने केल्या भावना व्यक्त

‘महाराजांबद्दल कोणी वाचलं तरी आयुष्य बदलेल, मला तर…’, रायगडावरून विकीने केल्या भावना व्यक्त

Vicky Kaushal: अभिनेता विकी कौशल गेल्या काही दिवसांपासून ‘छावा’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात अभिनेत्याने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. चाहत्यांनी देखील अभिनेत्याने साकारलेल्या भूमिकेला डोक्यावर घेतलं आहे. अशात शिवजयंतीचं निमित्त साधत अभिनेता रायगडावर उपस्थित राहिला आणि भावना व्यक्त केल्या. शिवाय अभिनेत्याने ‘छावा’ सिनेमाबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याची चर्चा रंगली आहे.

सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देत विकी कौशल म्हणाला, मी स्वतःला सौभाग्यशाली समजत आहे. मला याठिकाणी येण्याची संधी मिळाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या संर्वांना शुभेच्छा… रायगडावर यायचं एक स्वप्न होतं… दर्शनाची ओढ होती… आज महाराजांचे आशीर्वाद मिळालेत म्हणून चांगलं वाटत आहे… असं अभिनेता म्हणाला.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

 

पुढे विकीला ‘छावा’ सिनेमातील शेवटचा सीन पाहून चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आलं.. असं विचारण्यात आलं. यावर विकी म्हणाला, ‘भूमिका साकारण्यासाठी प्रचंड मेहनत लागली… छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या यातना सोसल्या आहेत, त्यापुढे आमची मेहनत काही नाही. त्यामुळे महाराजांची कथा जगापुढे मांडण्याची गरज होती. महाराष्ट्राच्या बाहेर संपूर्ण जगभरात छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास पोहोचवणं गरजेचं होतं… हाच आमचा एक उद्देश होता…’

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Maddock Films (@maddockfilms)

 

स्वतःला महाराजांच्या भूमिकेत कसं वाहून घेतलं… असं देखील अभिनेत्याला विचारण्यात आलं. विकी म्हणाला, ‘छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कोणी वाचलं तरी आयुष्य बदलेल. मला तर लक्ष्मण उतेकर यांनी महाराजांची भूमिका साकारण्याची संधी दिली. बरंच काही त्यांच्याकडून शिकायला मिळालं आहे.’ असं अभिनेता म्हणाला. सध्या फक्त आणि फक्त विकी कौशल आणि ‘छावा’ सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;