फलंदाजांमुळे मुंबई संकटात; सूर्या, शिवम शून्यावर, मुंबईचे 4 फलंदाज 5 धावांत गारद

फलंदाजांमुळे मुंबई संकटात; सूर्या, शिवम शून्यावर, मुंबईचे 4 फलंदाज 5 धावांत गारद

भरवशाच्या फलंदाजांनी मुंबईला पुन्हा एकदा संकटात ढकलले आहे. सर्वाधिक 42 वेळा रणजीच्या झळाळत्या करंडकावर नाव कोरणारा मुंबईचा संघ आपल्या फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे दुसऱ्या दिवसअखेर 7 बाद 188 अशी बिकट अवस्थेत सापडला आहे. पहिल्या डावात 383 धावा करणाऱ्या विदर्भाने मुंबईच्या फलंदाजांना धडाधड बाद करीत सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे. पार्थ रेखाडेच्या अफलातून फिरकीपुढे मुंबईच्या आघाडीच्या 4 फलंदाजांनी 5 धावांत माती खाल्ल्यामुळे मुंबई 195 धावांनी पिछाडीवर आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सलामीवीर आकाश आनंद 67, तर तनुष कोटियन 5 धावांवर खेळत होता. मुंबईला सामन्यात कमबॅक करायचे असेल तर संकटमोचक तनुष कोटियनला पुन्हा एकदा झुंजार खेळ करावा लागेल.

आज विदर्भाला चारशेपार धावांपासून रोखण्यात यशस्वी ठरलेल्या मुंबईने फलंदाजीत घोर निराशा केली. सलामीवीर आकाश आनंदने नाबाद अर्धशतकी खेळी करत एकाकी झुंज दिली. दर्शन नळकांडेने आयुष म्हात्रेला (9) मालेवरकरवी झेलबाद करून विदर्भाला सनसनाटी सुरुवात करून दिली. मग आकाश आनंद व सिद्धेश लाड (35) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी करीत मुंबईला सावरण्याचा प्रयत्न केला. यश ठाकूरने सिद्धेशचा त्रिफळा उडवून विदर्भाला दुसरे यश मिळवून दिले.

शिवम दुबेचा ‘पंच’

दरम्यान, विदर्भाने पहिल्या दिवसाच्या 5 बाद 308 धावसंख्येवरून मंगळवारी सकाळी पुढे खेळायला सुरुवात केली, मात्र मुंबईने विदर्भाला चारशेच्या आता गुंडाळण्यात यश मिळविले. यश राठोड (54) व अक्षय वाडकर (34) बाद झाल्यानंतर शिवम दुबेने शेपटाला झटपट गुंडाळून विदर्भाला 383 धावांवर रोखले. त्याने हर्ष दुबे (18), नचिकेत भुते (11) व यश ठाकूर (3) यांना बाद केले, तर दर्शन नळकांडे 12 धावांवर नाबाद राहिला. मुंबईकडून शिवम दुबेने 5 फलंदाज बाद केले, तर रॉयस्टन डायस व शम्स मुलांनी यांना 2-2 विकेट मिळाल्या. शार्दुल ठाकूरला एक विकेट मिळाली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;