हा तर अनादर! निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांची निवड ‘मध्यरात्री’; राहुल गांधींनी व्यक्त केली नाराजी

हा तर अनादर! निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांची निवड ‘मध्यरात्री’; राहुल गांधींनी व्यक्त केली नाराजी

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या नियुक्तीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी असहमती व्यक्त केली आहे. बैठकीनंतर राहुल गांधी यानी एक असमहती दर्शवणारे पत्र जारी केले. त्यात त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.

राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी नवीन मुख्य निवडणूक आयुक्त ( CEC ) नियुक्त करण्याचा घाईघाईने घेतलेला हा निर्णय हा ‘अनादर’ करणारा होता. पुढील निवडणूक आयोगाच्या आयुक्ताची निवड करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीचा भाग असलेले गांधी यांनी ‘X’ वरून आपली असहमती दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून देशाच्या सरन्यायाधीशांना समितीतून काढून टाकल्याबद्दल केंद्र सरकारवर टीका केली.

काँग्रेस खासदारानं आपल्या पत्रामध्ये म्हटलं आहे की, घाईघाईनं घेतलेल्या या निर्णयामुळे लाखो मतदारांच्या ‘आपल्या निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेबद्दलच्या चिंता वाढल्या आहेत’.

‘समिति आणि प्रक्रियेच्या रचनेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जात असताना आणि अठ्ठेचाळीस तासांपेक्षा कमी वेळात त्यावर सुनावणी होणार असताना पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी मध्यरात्री नवीन मुख्य निवडणूक आयुक्तपदाची निवड करण्याचा निर्णय घेणे अनादर करण्यासारखं आहे’, असं राहुल गांधी म्हणाले.

सोमवारी रात्री राष्ट्रपतींनी माजी आयएएस अधिकारी ज्ञानेश कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी आणि हरियाणाचे मुख्य सचिव डॉ. विवेक जोशी यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती केली.

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीच्या बैठकीनंतर काही तासांतच ही घटना घडली. राहुल गांधी यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात निवड प्रक्रियेवरील याचिकेवर सुनावणी होणार असल्याने या नियुक्तीवर आक्षेप घेतला.

ज्ञानेशकुमार देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;