मुलाच्या लग्नात वडील राज बब्बर यांनाच बोलावलं नाही; नवरी म्हणाली “जे महत्त्वाचे..”

मुलाच्या लग्नात वडील राज बब्बर यांनाच बोलावलं नाही; नवरी म्हणाली “जे महत्त्वाचे..”

ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बरने नुकतीच लग्नगाठ बांधली. प्रतीकने अभिनेत्री प्रिया बॅनर्जीशी लग्न केलं असून सध्या त्याचीच चर्चा रंगली आहे. प्रतीक आणि प्रिया हे त्यांच्या घरातच लग्नबंधनात अडकले आणि या लग्नाला फक्त मोजकेच कुटुंबीय, मित्रमैत्रिणी उपस्थित होते. आश्चर्याची बाब म्हणजे मुलाच्या लग्नात वडील राज बब्बर आणि त्यांच्या कुटुंबातील कोणीच उपस्थित नव्हते. याबाबत प्रतीकचा सावत्र भाऊ आर्य आणि सावत्र बहीण जुही बब्बर यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रतीक आणि प्रिया यांनी यावर मौन सोडलं आहे.

प्रतीकची पत्नी प्रिया बॅनर्जी म्हणाली, “लग्न किंवा आमच्या कोणत्याच कार्यक्रमातून कुटुंबातील कोणतीही व्यक्ती गायब नव्हती. कुटुंबातील सदस्य अनुपस्थित होते अशा अफवा का पसरवल्या जात आहेत हे मला माहीत नाही. आमच्या कुटुंबातील लोक तिथे होते, त्यात माझे आई-वडील, त्याच्या मावश्या, ज्यांनी त्याला लहानाचं मोठं केलं, त्याचे आजी-आजोबा, जे लोक आमच्यासाठी महत्त्वाचे होते ते सर्वजण आमच्यासोबत लग्नात उपस्थित होते. कुटुंबातील कोणीही गायब नव्हतं.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Banerjee (@priyabanerjee)

याविषयी ती पुढे म्हणाली, “प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास प्रतीकशी लग्न करणं आणि विवाहित असणं यात मला काही वेगळं काही वाटत नाही. आम्ही खूप वर्षांपासून सोबत राहतोय. जवळपास पाच वर्षे झाली आहेत. आम्ही एकाच घरात राहतोय. आम्ही एकमेकांना खूप चांगल्याप्रकारे ओळखतो. त्यामुळे मला असं वेगळं काही वाटत नाहीये.”

प्रियासोबतच्या लग्नाबद्दल प्रतीक म्हणाला, “मला असं वाटलं की जणू मी हजार वेळा लग्न करतोय. हे आणखी एक आयुष्य आणि आणखी एक ब्रह्मांडासारखं वाटत होतं. माझ्या प्रत्येक जन्मात आणि प्रत्येक ब्रह्मांडात मी तिच्याशी लग्न केलंय असं मला जाणवत होतं. अजूनही बरंच काही बाकी आहे.”

प्रतीकचा सावत्र भाऊ आर्य याने खुलासा केला होता की त्याच्या लग्नात बब्बर कुटुंबातील कोणत्याच सदस्यांना बोलावलं नव्हतं. इतकंच काय तर वडील राज बब्बर यांनासुद्धा त्याने लग्नासाठी आमंत्रित केलं नव्हतं, असं त्याने म्हटलं होतं. याबाबत प्रतीकची सावत्र बहीण जुहीसुद्धा हेच म्हणाली. “प्रतीक माझा भाऊ आणि आम्ही राज बब्बर यांची मुलं आहोत ही बाब कोणीच बदलू शकत नाही. सध्या त्याच्या अवतीभवती अशी काही लोकं आहे, ज्यांची नावं मला आता घ्यायची नाहीत, ज्यांनी त्याच्यावर खूप प्रभाव टाकलाय. परंतु आम्हाला त्याला अडचणीत आणायचं नाहीये. कारण त्याने कोणाचंच भलं होणार नाही”, असा दावा तिने केला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;