New Delhi Stampede- रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील दुर्घटनेवर काँग्रेस आक्रमक
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी झालेल्या चेंगराचेंगरीत 18 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले. यावरून काँग्रेसने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर निशाणा साधला आहे. या दुर्घटनेप्रकरणी काँग्रेसतर्फे रेल्वेमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. जेव्हा रेल्वे स्थानकावर भीषण परिस्थिती उद्भवली होती. महिला त्यांची मुलं चेंगराचेंगरीच अडकले होते. तेव्हा अश्विनी वैष्णव चेंगराचेंगरीच्या बातम्या आणि तेथील मृतांचा आकडा लपवण्यात व्यस्थ होते, असा आरोपही काँग्रेसने केला आहे .
रेल मंत्री को इस्तीफा देना चाहिए
देश से माफी मांगनी चाहिए pic.twitter.com/XR5APZtZoK— Congress (@INCIndia) February 16, 2025
काँग्रेसने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये दिल्लीतील चेंगराचेंगरीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी दुर्घटनेची सत्य परिस्थिती नागरिकांना दाखवली आहे. ‘नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर गैरव्यवस्थापनामुळे चेंगराचेंगरी झाली.’ अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. मुलेही मृत्युमुखी पडली. जेव्हा ही घटना घडत होती तेव्हा रेल्वेमंत्री सर्व काही ठीक असल्याचा दावा करत होते. चेंगराचेंगरीच्या बातम्या आणि तेथील मृतांचा आकडा लपवण्यात ते व्यस्थ होते. त्यामुळे अशा माणसाला मंत्रीपदावर राहण्याचा काहीही अधिकार नाहीए. रेल्वेमंत्र्यानी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि देशाची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस तर्फे करण्यात आली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List