आता तरी पंतप्रधान मोदी मणिपूरला भेट देऊन तिथे शांतता आणणार का? राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला सवाल

आता तरी पंतप्रधान मोदी मणिपूरला भेट देऊन तिथे शांतता आणणार का? राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला सवाल

केंद्र सरकारने मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरला भेट देणार का असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विचारला आहे. तसेच मणिपूरच्या या अवस्थेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट जबाबदार आहेत ही बाब सुद्धा ते नाकारू शकत नाहीत असेही राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, मणिपूरमध्ये केंद्र सरकारने उशिरा का होईना राष्ट्रपती राजवट लावण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे भाजपला मणिपूर सांभाळता आले नाही याचे उत्तम उदाहरण आहे. मणिपूरच्या या अवस्थेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट जबाबदार आहेत ही बाब सुद्धा ते नाकारू शकत नाहीत. पंतप्रधान मोदी मणिपूरला भेट देणार आहेत का? आणि मणिपूरच्या आणि हिंदुस्थानच्या जनतेला हे सांगणार का की तिथे शांतता कशी परत आणणार? असा सवालही राहुल गांधी यांनी विचारला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;