राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीला रत्नागिरीत सुरुवात; स्पर्धेत राज्यातील 32 संघ सहभागी

राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीला रत्नागिरीत सुरुवात; स्पर्धेत राज्यातील 32 संघ सहभागी

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित 21 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचा उद्घाटन समारंभ रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह येथे उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या हस्ते संपन्न झाले. स्पर्धेत राज्यातील 32 संघ सहभागी झाले आहेत.

अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा रत्नागिरीचे कार्याध्यक्ष समीर इंदुलकर, ज्येष्ठ रंगकर्मी राजकिरण दळी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे उपसंचालक नरेंद्र तायडे तसेच मान्यवर परीक्षक उपस्थित होते. राज्यगीताने उद्घाटन समारंभ सुरू झाला. नंतर मान्यवरांनी नटराज पूजन, दीप प्रज्वलन करून श्रीफळ वाढविला. सर्व मान्यवरांचे पुस्तक भेट देऊन स्वागत करण्यात आले. उद्घाटन समारंभास तसेच बालनाट्य पाहण्यासाठी रत्नागिरीतील विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;