रत्नागिरी तालुक्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार रखडले; मागण्यांसाठी पंचायत समितीवर धडक

रत्नागिरी तालुक्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार रखडले; मागण्यांसाठी पंचायत समितीवर धडक

रत्नागिरी तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा गेले दोन महिने पगार झालेला नाही. पगार न झाल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. पगार रखडल्यामुळे हे ग्रामपंचायत कर्मचारी रत्नागिरी पंचायत समितीवर धडकले.

पगार न झाल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने रत्नागिरी पंचायत समितीच्या आवारात उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना बोलावून अजूनपर्यंत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा पगार का काढला नाही याबाबत जाब विचारला. पैसे आलेले असताना पगार का काढला नाही याच्याबाबत विचारणा करून तात्काळ पगार काढा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;