आधी वक्तव्य करायचं, मग माफी मागायची हे संघाचं धोरण; महाराष्ट्रातील जनतेनं सावध रहावं! – संजय राऊत

आधी वक्तव्य करायचं, मग माफी मागायची हे संघाचं धोरण; महाराष्ट्रातील जनतेनं सावध रहावं! – संजय राऊत

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान करणारे अभिनेते राहुल सोलापूरकर यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात त्यांनी घटनाकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वक्तव्य केले आहे. वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे ब्राह्मण ठरतात, असे ते म्हणतात. यावरून टीकेची राळ उठली असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनीही यावर दिल्लीत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भाष्य केले आहे.

राहुल सोलापूरकर यांचा संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आहे. त्यांनी आधी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वक्तव्य केले, त्यानंतर महामानव, घटनाकार, भारतरत्न डॉ. आंबेडकरांबाबत वक्तव्य केले. आधी वक्तव्य करायचे, मग माफी मागायची हे एकंदर संघाचे धोरण दिसत आहे. महाराष्ट्रात जातीयवादाला खतपाणी घालायचे, उद्रेक घडवायचा, दंगलसदृश परिस्थिती निर्माण करायची आणि भाजपला जातीय राजकारणात मदत होईल अशा प्रकारच्या भूमिका सातत्याने घ्यायच्या हे संघाचे धोरण दिसत आहे. पण महाराष्ट्रातील जनतेने या सगळ्या लोकांपासून सावध राहिले पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.

आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश करण्यात आला असून यात एकनाथ शिंदेंना स्थान देण्यात आलेले नाही. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. कदाचित आपत्ती व्यवस्थापनात अजित पवार यांना जास्त ज्ञान असेल. कारण अटल बिहारी वाजपेयी यांनी गुजरातमधील भूज येथे झालेल्या भूकंपानंतर अजित पवार यांचे काका शरद पवार यांना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख केले होते. बहुतेक तोच वारसा फडणवीस यांनी खाली दिला असेल.’

भारत ट्रम्पपुढे शरणागत झालाय असं चित्र

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर निघाले असून तिथे ते नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. यावरही बोलताना राऊत यांनी मोदींवर खरपूस शब्दात टीका केली. अमेरिकेत जाऊन नरेंद्र मोदी ट्रम्प यांना मिठी नक्कीच मारतील, पण त्यामुळे 18,000 भारतीयांना परत पाठवण्याची योजना थांबणार आहे का? हातापायात बेड्या घालून 130 भारतीयांना ज्या पद्धतीने उतरवले गेले, ते विमान इथे न उतरू देण्याची हिंमत मोदींनी दाखवली असती तर ते ट्रम्प यांना ताठ मानेने भेटायला गेले असते. पण आज भारत ट्रम्प यांच्यापुढे शरणागत होऊन भेटायला जातोय असे चित्र या देशात निर्माण झाले आहे, असी टीका राऊत यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;