आता जाण्याची वेळ आली…, अमिताभ बच्चन यांच्या ‘त्या’ ट्विटनंतर चाहते चिंतेत

आता जाण्याची वेळ आली…, अमिताभ बच्चन यांच्या ‘त्या’ ट्विटनंतर चाहते चिंतेत

Amitabh Bachchan Social Media Post: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन कितीही व्यस्त असले तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात आणि चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून बिग बी कायम त्यांच्या मनातील विचार मांडत असतात. पण आता अमिताभ बच्चन यांनी केलेलं ट्विट पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांच्या ट्विटची चर्चा रंगली आहे. ट्विटवर अनेक चाहते प्रतिक्रिया देत चिंता व्यक्त करत आहेत.

सांगायचं झालं तर, 82 वर्षीय अमिताभ बच्चन यांनी 7 फेूब्रुवारी 8 वाजून 34 मिनिटांनी ट्विट केलं आहे. ट्विट करत बिग बी यांनी ‘जाण्याची वेळ आली आहे…’ असं लिहिलं आहे. अमिताभ बच्चन यांच्या ट्विटनंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे… असं काहीही बोलू नका… अशी कमेंट बिग बींच्या एका चाहत्यांची केली आहे.

 

 

अमिताभ बच्चन यांनी ‘जाण्याची वेळ आली आहे…’ असं ट्विट केलं आहे. पण या ट्विटमागे नक्की काय रहस्य आहे, हे बिग बींनी स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळे ट्विटनंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. बिग बी यांनी असं ट्विट का केलं? असा प्रश्न आता त्यांच्या चाहत्यांना पडला आहे.

 

 

अमिताभ बच्चन यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, बिग बीच्या चाहत्यांची संख्या भारतातचं नाही तर, परदेशात देखील फार मोठी आहे. वयाच्या 82 व्या वर्षी देखील बिग बी मोठ्या पडद्यावर सक्रिय आहे. त्यांना रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आजही तितकेच उत्सुक असतात. पण आता बिग बी यांच्या ट्विटनंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते चिंता व्यक्त करत आहेत.

अमिताभ बच्चन यांचे आगामी सिनेमे

बिग बींच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, सध्या अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती 16’ शो होस्ट करत आहे. सध्या त्यांनी कोणत्या सिनेमाची घोषणा केलेली नाही. पण बिग बी ‘रामायण’ सिनेमात झळकतील असं सांगण्यात येत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;