ट्रिपल इंजिन सरकारने ठाण्यातल्या ठेकेदारांचे दीड हजार कोटी थकवले, पीडब्ल्यूडी कार्यालयाबाहेर बोंबाबोंब आंदोलन

ट्रिपल इंजिन सरकारने ठाण्यातल्या ठेकेदारांचे दीड हजार कोटी थकवले,  पीडब्ल्यूडी कार्यालयाबाहेर बोंबाबोंब आंदोलन

विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही अशी घोषणा राज्याच्या सरकारमधील अनेक मंत्री वारंवार करीत असतात. पण प्रत्यक्षात विकासकामे करणाऱ्या ठाण्यातील ठेकेदारांचे दीड हजार कोटी रुपये थकवले असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ठेकेदारांची बिलेच न दिल्याने त्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. संतप्त ठेकेदारांनी सरकारविरोधात आज पीडब्ल्यूडी कार्यालयाबाहेर बोंबाबोंब आंदोलन केले.ठेकेदारांनी घेतलेल्या या पवित्र्यामुळे ठाणे जिल्ह्यातील विकासकामे रखडण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

विधानसभा निवडणुकीआधी लाडक्या बहिणींना खूश करण्यासाठी राज्य सरकारने करोडो रुपये खर्च केलेत. या योजनेमुळे तिजोरीत खडखडाट झाला असून ठेकेदार तसेच कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागात काम करणाऱ्या ठेकेदारांनी आज चक्क सरकारच्या विरोधात आवाज उठवत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. ठेकेदार शासनाच्या या दिरंगाईला वैतागले असून काम चालू करण्यास ठेकेदारांनी असमर्थता दर्शवली आहे. जोपर्यंत जुनी बिले देत नाहीत, तोपर्यंत कामांना हात लावणार नसल्याची भूमिका ठेकेदारांनी घेतली असल्याने प्रशासनाची चांगलीच तंतरली आहे.

सरकारने आताच जागे व्हावे

जिल्ह्यात जवळपास 10 हजार ठेकेदार काम करीत आहेत. 1 लाखापासून ते 10 कोटींपर्यंत ठेकेदारांनी स्वतःच्या जोखिमेवर काम केले आहे. बँकेतून लोन घेऊन घरातील दागिने विकून ठेकेदारांनी प्रामाणिकपणे काम केले आहे. आता बिलेच वेळेवर मिळत नसल्याने कर्जाचे हप्ते कसे फेडायचे असा सवाल ठेकेदारांनी उपस्थित केला आहे.

ही कामे रखडली

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, शासकीय इमारती आणि रस्ते दुरुस्ती, जलजीवन मिशन योजना, आदिवासी पाड्यातील रस्ते, पूल, साकव बांधणे, आश्रमशाळा दुरुस्ती, जिल्ह्यातील वैद्यकीय रुग्णालयांची कामे, न्यायालये तसेच पोलीस इमारतींची कामे रखडली आहेत.

… अन्यथा मुंबईत घुसू

विकासासाठी स्वतःचे तन-मन-धन खर्च करून काम करा असा संदेश प्रधानमंत्री देतात. मात्र आमच्या हक्काचे पैसे आम्हाला सरकार का वेळेवर देत नाही? असा सवाल आंदोलकर्त्यांनी केला. सरकारने आम्हाला वेळेत आमची बिले दिली नाहीत, तर जेसीबी, पोकलेन, डंपर, फावडे घेऊन लवकरच मुंबईकडे कूच करू असा इशारा या वेळी देण्यात आला.

शासनाला दीड वर्षापासून पत्रव्यवहार केला आहे. हजारो कोटी निधी रखडवून ठेवला असून त्यात तुटपुंज्या पैशांत आम्ही घर कसे चालवणार असा सवाल ठेकेदारांनी केला आहे. त्यामुळे सरकारने आताच जागे व्हावे, अन्यथा सरकारला परिणाम भोगावे लागतील.
– मंगेश आवळे (ठेकेदार)

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;