राज्याच्या मंत्रिमंडळात 65 टक्के मंत्री भ्रष्टाचारी, मंत्रिमंडळाला बरखास्त केलं पाहिजे – नाना पटोले

राज्याच्या मंत्रिमंडळात 65 टक्के मंत्री भ्रष्टाचारी,  मंत्रिमंडळाला बरखास्त केलं पाहिजे – नाना पटोले

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात 65 टक्के मंत्री हे भ्रष्टाचारी असून त्यांच्यावर खून, बलात्कारचे आरोप आहेत. 65 टक्के मंत्रिमंडळच जर भ्रष्टाचारी असेल तर, हे मंत्रिमंडळ बरखास्त केलं पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे, असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते असं म्हणाले आहेत.

नाना पटोले म्हणाले की, ”फक्त धनंजय मुंडेच नाही, तर je दागी मंत्री आहेत, त्या सगळ्यांची माहिती आम्ही विधानभवनात मांडणार आणि सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल.” यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की, ओबीसी म्हणून मला टार्गेट केलं जात आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले. तुम्हाला वाटतंय का धनंजय मुंडे यांना ओबीसी असल्यामुळे टार्गेट केलं जात आहे? याचं उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रात ओबीसींची परिस्थिती फार वाईट आहे. ओबीसींची मते भाजप घेते, मात्र सातत्याने ओबीसींवर अत्याचार करत आहे. हे आम्ही जेव्हा म्हणालो होतो, तेव्हा तो आरोप होता. आता त्या मंत्रिमंडळातलाच ‘मंत्री मी ओबीसी आहे म्हणून मला टार्गेट केलं जात आहे’, असं म्हणत असेल तर, मग आम्ही केलेले आरोप सत्य आहेत.

ते म्हणाले, ”ओबीसींच्या मुलांची आज स्कॉलरशिप, राजकीय आरक्षण, ओबीसींचा आर्थिक आणि सामाजिक विषय असेल, याकडे भाजप दुर्लक्ष करत आहे. भाजपने सातत्याने ओबीसी समाजाला टार्गेट केलं आहे, त्यांना विरोध केला आहे. यातच धनंजय मुंडे ज्याप्रकारे आपली भूमिका मांडत आहे, यावरून हे स्पष्ट होत आहे. याआधी छगन भुजबळ यांनीही आपली भूमिका मांडली. ओबीसींचं नेतृत्व करणाऱ्या छगन भुजबळ यांनाही त्यांनी अपमानित केलं. यामुळे भाजप सातत्याने ओबीसींच्या विरोधात आहे, यातून हे स्पष्ट झालं आहे.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;