सरकार निवडणुकीच्या चक्रातून बाहेर येत नाही, तोपर्यंत देशाचा विकास होऊ शकत नाही; संजय राऊत यांनी ठणकावले

सरकार निवडणुकीच्या चक्रातून बाहेर येत नाही, तोपर्यंत देशाचा विकास होऊ शकत नाही; संजय राऊत यांनी ठणकावले

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी राज्यसभेत देशातील लोकशाही आणि महाकुंभमध्ये झालेल्या दुर्घटनेबाबत भाष्य केले. यावेळी देशातील लोकशाही गंभीर स्थितीत आहे. सरकार निवडणुकीच्या चक्रातून बाहेर पडत नाही, तोपर्यंत देशाचा विकास होऊ शकत नाही, असे परखड मतही त्यांनी व्यक्त केले.

भारत हा महान देश आहे. महान देशाचे राष्ट्रपती आपले विचार एखाद्या मंचावर मांडतात, तेव्हा त्या विचारांचा आदर केला पाहिजे. त्यावर चिंतन केले पाहिजे. आपल्या सध्या आपल्या देशात अशी स्थिती दिसत नाही. आपल्या देशातील लोकशाही फ्रॅक्टर झाली आहे, आयसीयूमध्ये आहे, शेवटच्या घटका मोजत आहे, अशा देशात राष्ट्रपती किंवा पंतप्रधानांचे विचार देशातील जनता गंभीरतेने घेत नाही. हे दुर्दैवी आहे, असे संजय राऊत म्हणाले.

देशातील लोकशाहीच्या महत्त्वाच्या संस्था संसद, न्यायव्यवस्था यावरील जनतेचा विश्वास कमी होत आहे. फक्त निवडणुका घेणे, त्या जिंकणे आणि त्या जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाणे, ही लोकशाही निश्चितच नाही. देशात सध्या सरकार निवडणूक कामात गुतंले आहे. पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्र्यासह अनेक केंद्रीय मंत्री निवडणूक प्रचारात गुतंलेले दिसतात. जोपर्यंत पंतप्रधानांपासून केंद्रीय मंत्र्यांपर्यंतचे सर्वजण निवडणुकीच्या या चक्रातून बाहेर येत नाही. तोपर्यंत देशाचा विकास होऊ शकत नाही. त्यामुळे निवडणूक प्रचारात लक्ष घालण्याऐवजी सरकारने सरकारचेच काम करणे गरजेचे आहे. निवडणुकीत अनेक खोटी, फसवी आश्वासने देण्यात येतात. अनेक मोठ्यामोठ्या बाता मारण्यात येतात. सत्य लपवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. यावरून सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची वृत्ती दिसून येते, असे त्यांनी स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;