Urmila Matondkar: एका चुकीमुळे उद्ध्वस्त झालं उर्मिलाचं आयुष्य, आता जगतेय असं जीवन

Urmila Matondkar: एका चुकीमुळे उद्ध्वस्त झालं उर्मिलाचं आयुष्य, आता जगतेय असं जीवन

Urmila Matondkar: अभिनेत्री उर्मिला मातोंडकर गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. पण एक काळ असा होता जेव्हा उर्मिलाने फक्त बॉलिवूडवर नाही तर, चाहत्यांच्या मनावर देखील राज्य केलं. पण एका चुकीमुळे अभिनेत्रीचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. 90 च्या दशकात उर्मीला अभिनेत्रींच्या यादीत अव्वल होती. शिवाय अभिनेत्रीचं मानधन देखल अभिनेत्यांपेक्षा अधिक होतं. आजही अभिनेत्री चाहत्यांमध्ये चर्चेत असते. पण सिनेमांमध्ये दिसत नाही.

उर्मिला हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, वयाच्या अवघ्ये तिसऱ्या वर्षी अभिनेत्रीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. बालकलाकार म्हणून अभिनेत्री अभिनयास सुरुवात केली. त्यानंतर अभिनेत्री लिड अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण यशाच्या उच्च शिखरावर पोहोल्यानंतर अभिनेत्रीला एक चूक महागात पडली.

 

 

बॉलिवूडमध्ये करीयर करत असताना, उर्मिला ‘रंगिला’ सिनेमाचे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या प्रेमात पडली. तेव्हा दिग्दर्शक विवाहित होते. असं असताना राम गोपाल वर्मा यांचा जीव उर्मिलावर जडला होता. त्यानंतर राम गोपाल वर्मा यांच्या प्रत्येक सिनेमात उर्मिलाच मुख्य अभिनेत्री म्हणून झळकू लागली.

उर्मिलाने राम गोपाल वर्मा व्यतिरिक्त इतर दिग्दर्शकांच्या सिनेमात काम करणंही बंद केलं. याचा अभिनेत्रीच्या करिअरवर खूप वाईट परिणाम झाला. अनेक दिग्दर्शक उर्मिलावर नाराज झाले आणि नंतर तिला काम मिळणे बंद झालं. उर्मिलाला काम मिळणं बंद झालं आणि राम गोपल वर्मा यांच्यासोबत असलेलं अभिनेत्रीचं नातं देखील फार काळ टिकलं नाही. दोघांच्या नात्याचा अंत देखील वाईट झाला.

 

 

आज उर्मिला बॉलिवूडपासून दूर आहे. पण अनेक कार्यक्रम किंवा कोणत्या सोहळ्यात अभिनेत्रीला स्पॉट केलं जातं. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;