पहिल्या बायकोला बिहारमध्ये ठेवून प्रसिद्ध गायकाने मुंबईत थाटला दुसरा संसार, प्रकरण समोर येताच माजली सर्वत्र खळबळ

पहिल्या बायकोला बिहारमध्ये ठेवून प्रसिद्ध गायकाने मुंबईत थाटला दुसरा संसार, प्रकरण समोर येताच माजली सर्वत्र खळबळ

Singer Personal Life: झगमगत्या विश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी संघर्ष करून बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. पण प्रसिद्ध आणि लोकप्रियता मिळाल्यानंतर सेलिब्रिटी त्यांच्या खासगी आयुष्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले. असंच काही झालं आहे गायक उदित नारायण यांच्यासोबत… उदित नारायण यांनी पहिली पत्नी रंजना झा असताना मुंबईत दीपा गहतराज यांच्यासोबत लग्न केलं.

पहिल्या पत्नीच्या नकळत उदित नारायण यांनी दुसरा संसार थाटला. त्यांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल जेव्हा पहिल्या पत्नीला कळलं, तेव्हा हे प्रकरण कोर्टात पोहोचलं. तर उदित नारायण यांच्या आयुष्यातील ही बाजू फार कमी लोकांना माहिती आहे. बिहारच्या छोट्या गावात जन्मलेले उदित नारायण मुंबईत संगीत विश्वात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी आहे.

 

 

करीयरच्या सुरुवातील उदित नारायण यांनी प्रचंड संघर्ष केला आणि आपल्या दमदार आवाजाने चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाल्यानंतर उदित नारायण यांनी पहिल्या पत्नीच्या नकळत दीपा गहतराज यांच्यासोबत दुसरं लग्न केलं.

उदित नारायण यांची पहिली पत्नी त्यांच्या प्रतीक्षेत अनेक वर्ष बिहार याठिकाणी राहिली. पण एक दिवस असा आला जेव्हा रंजना यांना नारायण यांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल कळलं. तेव्हा रंजना यांना मोठा धक्का बसला आणि त्या मुंबईत आल्या.

मुंबईत आलेल्या रंजना यांना जेव्हा उदित नारायण यांनी ओळखण्यास देखील नकार दिला तेव्हा प्रकरण कोर्टात पोहोचलं. कोर्टात पोहोचल्यानंतर उदित नारायण यांनी पहिली पत्नी रंजना यांची जबाबदारी स्वीकारली…

 

 

मीडियारिपोर्टनुसार, रंजना यांनी उदित यांच्यावर आरोप केले होते. ‘आपल्या लग्नाबद्दल सर्वांना माहिती झाल्यास मी स्वतःला संपवेल…’ अशी धमकी उदित नारायण यांनी पहिल्या पत्नीला दिला. पण त्यांच्या धमकी न घाबरता रंजना यांनी स्वतःच्या हक्कासाठी आवाज उठवला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;