अर्थसंकल्प समजायला 72 तास लागतात, मोदींना त्यातलं काय कळलं जे ते जोरजोरात बाकं वाजवत होते? संजय राऊत यांचा टोला

अर्थसंकल्प समजायला 72 तास लागतात, मोदींना त्यातलं काय कळलं जे ते जोरजोरात बाकं वाजवत होते? संजय राऊत यांचा टोला

शनिवारी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बाकं वाजवत होते. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मोदींना जोरदार टोला लगवला आहे. ”अर्थसंकल्प समजायला 72 तास लागतात. बाईंनी अर्थसंकल्प वाचला व आम्हाला समजलं असं कुणी म्हणतं असेल तर ते मुर्ख आहेत. आपल्याकडे असे कोणते मोठे तज्ञ आहेत ज्यांना एवढ्या लगेच अर्थसंकल्प कळला. अर्थसंकल्पाचे भाषण सुरू असताना मोदी जोरजोरात बाकं वाजवत होते, त्यांना काय अर्थसंकल्प कळला? असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

”अर्थमंत्रीपदावरील व्यक्ती खडूसच असायला पाहिजे. अग्रलेखात त्या बाईंना खडूस म्हटलं त्यामागचं कारण जाणून घेण्यासाठी तुम्ही अग्रलेख नीट वाचा. अर्थमंत्रीपदावरची व्यक्ती खडूस, कठोर व दयाबुद्दीने काम न करणारी असते. तिला फक्त देशाच्या तिजोरीत महसूल जमा करायचा असतो. त्यासाठी कुणाच्या खिशात हात घालायचा, कुणाची पाकिटं मारायची यासाठी अर्थमंत्र्यांची नेमणूक असते. प्रधानमंत्र्यांना ज्या गोष्टींचा वाईटपणा घ्यायचा नसतो त्या गोष्टी अर्थमंत्र्यांच्या माध्यमातून करून घेत असतात”, असं संजय राऊत म्हणाले.

”या अर्थसंकल्पात महागाई, बेरोजगारी कमी करण्यासाठी काही उपाययोजना आहे का? महागाई व बेरोजगारी कमी होणार नसेल तर मध्यमवर्गीयांचं कसं भलं होणार. रुपया 87 वर आला आहे. रुपया मजबूत करण्यासाठी काही योजना आहेत का? 12 लाखापर्यंत जो इनकम टॅक्स स्लॅब आहे त्यापलिकडे मध्यमवर्गीयांसाठी किंवा गरिबांसाठी कोणतीही योजना मला दिसत नाही. 12 लाखावरचं इनकम टॅक्स भरण्यासाठी तेवढं इनकम आणावं लागेल ना. एवढं इनकम कुणाकडे आहे? अनेक लोकं कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणून काम करतात. उच्च शिक्षित पदवीधर कॉ़न्ट्रॅक्टरवर काम करत आहेत. त्यांचं उत्पन्न थेट कागदावर येत नाही. त्यांच्यातील किती लोकांचं उत्पन्न 12 लाखवाले किती आहेत. याचा खुलासा ज्यांना आपण खडूस म्हणताय त्यांनी करायला हवा, असा सवाल त्यांनी यावेळी केला.

”अर्थसंकल्प समजायला किमान 72 तास लागतात. बाईंनी अर्थसंकल्प वाचला व आम्हाला समजलं असं कुणी म्हणतं असेल तर ते मुर्ख आहेत. आपल्याकडे असे कोणते मोठे तज्ञ आहेत ज्यांना एवढ्या लगेच अर्थसंकल्प कळला. मोदी जोरजोरात बाकं वाजवत होते, त्यांना काय अर्थसंकल्प कळला? असा टोला संजय राऊत यांनी मोदींना लगावला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;