गिरणी कामगारांना मुंबईतच घरे द्या! सचिन अहिर यांची मागणी

गिरणी कामगारांना मुंबईतच घरे द्या! सचिन अहिर यांची मागणी

गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नावर तातडीची बैठक बोलावण्याचे सरकारने आश्वासन दिले होते. मुंबईतील केंद्र सरकारच्या एनटीसी किंवा खासगी गिरण्यातील कामगारांना मुंबईतच घरे मिळणे शक्य आहे. फक्त सरकारची मानसिकता असावयास हवी. गिरणी कामगारांना मुंबईतच घरे द्या, अशी मागणी शिवसेनेचे उपनेते आमदार सचिन अहिर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सरकारकडे केली.

मुंबईत जिल्हा नियोजन समितीची नुकतीच बैठक पार झाली. त्यावेळी गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळाली पाहिजेत, या वाढत्या मागणीकडे आमदार सचिन अहिर यांनी मुंबईचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधले. गिरणी कामगारांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्याग करूनही त्यांना मुंबईत का घरे मिळत नाहीत, असा जाब त्यांनी सरकारला विचारला. यावेळी मुंबईत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;