कामाच्या तासांवरून चर्चा सुरूच; दोन सुट्ट्यांसाठी कोट्यवधींची पगारही नाकारतात इंजिनीअर

कामाच्या तासांवरून चर्चा सुरूच; दोन सुट्ट्यांसाठी कोट्यवधींची पगारही नाकारतात इंजिनीअर

सध्या देशात कामाचे तास आणि आठवड्याच्या सुट्ट्या यावरून चर्चा सुरू आहे. यावर प्रत्येकजण आपापले मत मांडत आहे. कामाच्या तासांपेक्षा कामाच्या दर्जाला महत्त्व देण्याचे मतही अनेकांनी मांडले आहे. तसेच जगभरात काही देशांनी फक्त चार दिवसांचा आठवडा जाहीर करत कर्मचाऱ्यांना तीन दिवस आठवड्याची सुटी जाहीर केली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना घरासाठी, कुटुंबीयांसाठी, छंदासाठी वेळ देता येतो आणि त्यामुळे त्यांचे कामकाज सुधारते, असे मत कंपनीने म्हटले आहे. आता एका व्हायरल पोस्टने या वादात आगीत तेल ओतले आहे.

लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एस.एन. सुब्रमण्यम यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना रविवारसह आठवड्यातून 90 तास काम करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे याबाबतच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या होत्या. आता सॅन फ्रान्सिस्कोमधील एका टेक कंपनीचे सह-संस्थापक वरुण वूमडी यांनी भारतीय अभियंत्यांच्या कार्यसंस्कृतीवर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणतात की भारतीय अभियंते चांगले पगार मिळत असूनही आठवड्यातील सहा दिवस काम करण्यास तयार नसतात. कंपनीच्या भारतीय शाखेत अभियंत्रे मिळणे कठीण होत आहे. बहुतेक अभियंते आठवड्यातून सहा दिवस काम करण्यास तयार नाहीत. त्यांना १ कोटी रुपये किंवा त्याहून अधिक पगाराची ऑफर दिली गेली तरीही त्यांना पाच आठवड्यांचाच आठवडा असलेली नोकरी करायची असते. 1 कोटी रुपये पगार मिळत असूनही 3 ते 8 वर्षांचा अनुभव असलेले अभियंते आठवड्यातून सहा दिवस काम करण्यास नकार देतात, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

त्यांच्या या पोस्टवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी अभियंत्यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वेगवेगळे प्राधान्यक्रम असतात. तुम्ही पैशाने लोकांना खरेदी करू शकत नाही. ते पैशाचा आदर करतात, पण त्याची पूजा करत नाहीत. तसेच कामाच्या तासापेक्षा दर्जाही महत्त्वाचा आहे. तुम्ही कोट्यवधींचा पगार द्याल. मात्र, त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तीक आयुष्यासाठी, कुटुंबीयांसाठी वेळच देता येणार नाही, असे अनेक नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

वूमडी यांच्या या पोस्टमुळे पुन्हा एकदा कामाच्या तासांबाबत चर्चा होत आहे. उच्च पगार की पाच दिवसांचा आठवडा अशी चर्चा सुरू आहे. अनेकजण कामांच्या तासांपेक्षा कामाच्या दर्जाला प्राधान्य देत असून स्वतःसाठी, कुटुंबीयांसाठी वेळ देणे महत्त्वाचे मानतात, असे दिसून येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;