ममता कुलकर्णीचं धीरेंद्र शास्त्री आणि रामदेव बाबा यांना सडेतोड उत्तर, व्हिडीओ पाहून म्हणाल…

ममता कुलकर्णीचं धीरेंद्र शास्त्री आणि रामदेव बाबा यांना सडेतोड उत्तर, व्हिडीओ पाहून म्हणाल…

Mamta Kulkarni: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ते महामंडलेश्वर बनलेली ममता कुलकर्णी नुकताच एका शोमध्ये पोहोचली होती. यावेळी ममता हिने बाबा रामदेव आणि धीरेंद्र शास्त्री यांच्यावर टीका केली. रामदेव बाबा यांना महाकाल आणि महाकाली यांची भीती असायला हवी… पुढे ममता हिने धीरेंद्र शास्त्री यांच्या वयावर टीका केली. सध्या सर्वत्र ममता कुलकर्णी हिची चर्चाा रंगली आहे. ममता कुलकर्णी हिने किन्नर आखाड्यात सामिल होऊन संन्यास धारण केला आहे. यावर अनेक धार्मिक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ममता कुलकर्णी हिला महामंडलेश्वर पदवी दिल्यानंतर रामदेव बाबा यांनी स्वतःचं मत व्यक्त केलं होतं. ‘एका दिवसात कोणीही संतपद प्राप्त करू शकत नाही. हे पद मिळवण्यासाठी अनेक वर्ष तपस्या करावी लागते. आजच्या दिवसांत मी पाहत आहे कोणालाही उचलून महामंडलेश्वर केलं जातंय…’ असं रामदेव बाबा म्हणाले होते. तर धीरेंद्र शास्त्री म्हणाले, कोणत्याही प्रकारच्या बाह्य प्रभावाखाली येऊन कोणाला संत किंवा महामंडलेश्वर कसा बनवता येईल? पदवी अशा व्यक्तीला दिली पाहिजे जिच्यामध्ये संत किंवा साध्वीची भावना असेल…

सांगायचं झालं तर, ममता कुलकर्णी ‘आपकी अदालत’ शोमध्ये पोहोचली होती. शोमध्ये रजत शर्मा यांनी ममता हिला रामदेव बाब आणि धीरेंद्र शास्त्री यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर ममता हिने देखील सडतोड उत्तर दिलं आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajat Sharma (@rajatsharmalive)

 

ममता कुलकर्णी म्हणाली, ‘आता मी रामदेव बाबा यांना काय बोलू… त्यांना महाकाली आणि महाकाल यांची भीती असायला हवी…’ पुढे धीरेंद्र शास्त्री यांनी उत्तर देत म्हणाली, ‘तो नॅपी धीरेंद्र शास्त्री… जेवढं त्यांचं वय आहे, तेवढी मी तपस्या केली आहे. धीरेंद्र शास्त्री यांना एकच सांगेल, स्वतःच्या गुरुंना विचारा मी कोण आहे आणि शांत बसा…’ सध्या सर्वत्र ममता कुलकर्णी हिची चर्चा रंगली आहे.

ममता कुलकर्णीचे सिनेमे

आता अभिनेत्रीने संन्यास स्वीकारला आहे. पण एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त ममता कुलकर्णी हिचा बोलबाला होता. बॉलिवूडमध्ये सक्रिय असताना अभिनेत्रीने ‘अशांत’, ‘आशिक आवारा’, ‘करण अर्जुन’ आणि ‘वक़्त हमारा है’ या सिनेमांमध्ये काम केलं. अभिनेत्रीवे 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तिरंगा’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आजही अभिनेत्री कोणत्या म कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;