विकसित भारत हेच आमचे ध्येय -राष्ट्रपती, संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात

विकसित भारत हेच आमचे ध्येय -राष्ट्रपती,  संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात

भारतीय प्रजासत्ताकाने 75 वर्षांचा प्रवास पूर्ण केला. दोन महिन्यांपूर्वीच आपण संविधान स्वीकारल्याचा 75 वा वर्धापन दिन साजरा केला. हा प्रसंग लोकशाहीची जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या देशाच्या वैभवाला नवीन उंची देईल. विकसित भारत हेच आमच ध्येय्य आहे, असे सांगत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा अभिभाषणातून मांडला. राष्ट्रपतींनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच महाकुंभात झालेल्या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले. तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही श्रद्धांजली अर्पण केली.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशानाच्या सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने झाली. दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या, आज, प्रत्येकजण देशाच्या विकासाला पाठिंबा देत आहे आणि म्हणूनच आपण देशाच्या पूर्ण क्षमतेचा अनुभव घेत आहोत. दलित, वंचित आणि आदिवासी समुदायांना त्याचे फायदे मिळत आहेत. दुर्लक्षित असलेल्या आदिवासी समाजाच्या कल्याणाला आम्ही प्राधान्य दिले. तीन कोटी अतिरिक्त कुटुंबांना नवीन घरे देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भाषण करता करता थकल्या बिचाऱ्या राष्ट्रपती सोनिया गांधी यांची टीका 

भाषण करता करता थकल्या बिचाऱ्या राष्ट्रपती. राष्ट्रपती यांची भाषण करताना चांगलीच दमछाक झाली. त्या कशाबशा बोलत होत्या. हे फारच वाईट, असे म्हणत कॉँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणावर टीका केली. दरम्यान, सोनिया गांधी यांच्या प्रतिक्रियेला विरोधी पक्षनेते राहुल गांधी होकार दिला. राष्ट्रपतींनी भाषणात तेच तेच मुद्दे सांगितले. त्यांचे भाषण खूपच कंटाळवाणं असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, टीका करणाऱ्यांना हिंदी समजल नसावं, असे स्पष्टीकरण राष्ट्रपती कार्यालयाने दिले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;