लोकांनी आपल्याला केलेलं मतदान गायब झालं! राज ठाकरे यांचा EVM वर हल्ला

लोकांनी आपल्याला केलेलं मतदान गायब झालं! राज ठाकरे यांचा EVM वर हल्ला

ज्या दिवशी महाराष्ट्रात निवडणुकीचा निकाल लागला, मी पहिल्यांदा महाराष्ट्रात असं बघितलं सन्नाटा पसरला. ज्या प्रकारचा जल्लोष व्हायला हवा होता, मिरवणुका निघायला हव्या हत्या. पण सन्नाटा होता. कारण लोकांमध्येच संभ्रम होता. काय आहे हे, हे कसं झालं? असा कसा निर्णय आला, असे म्हणत मनसे नेते राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक निकाल आणि ईव्हीएमवर संशय व्यक्त केला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित एक व्यक्ती माझ्याकडे आली होती. त्यांच्याही मनाला निकाल पटलेला नसल्याचं मला दिसलं. ते म्हणाले, इतना सन्नाटा क्यों है भाई, कोई तो जिता होगा. कोणीतरी जिंकलं असेल की ज्यातून जल्लोष होईल. पण महाराष्ट्रात जो सन्नाटा पसरला, हे कसलं द्योतक आहे? काही काही गोष्टींवर तर विश्वासच बसू शकत नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रात अनेक असे निकाल आहेत ज्याच्यावर निवडून आलेल्यांचा विश्वास नाही, पडलेल्यांचं काय घेऊन बसलो आपण. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात सात वेळा आमदार झाले. ही त्यांची आठवी टर्म होती. सातवेळा जो नेता 70 ते 80 हजार मताधिक्क्याने निवडून याचे ते बाळासाहेब थोरात 10 हजार मतांनी पराभूत झाले. मीच काय अख्खा महाराष्ट्र बलतोय. जे निवडून आले, सत्तेत आले, त्यांतील अनेकांचे मला फोन आले. त्यांना शॉक बसलाय. भाजपला समजू शकतो 132 जागा. अजित पवार 42 जागा? चार-पाच जागा येतील की नाही? असं सगळ्यांना वाटत असताना अजित पवार 42, यावर कोणाचा तरी विश्वास बसेल का? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. जे महाराष्ट्रात इतकी वर्षे महाराष्ट्रात राजकारण करत आले. ज्यांच्या जीवावर अजित पवार, भुजबळ मोठे झाले. त्या शरद पवारांना 10 जागा मिळतात. हे न समजण्याच्या पलिकडची गोष्ट आहे, अशी शंका राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

काय झालं, कशामुळे झालं? हा संशोधनाचा विषय आहे. या मतदानावर जाऊ नका, लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे. फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाहीये. लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही, हे तुम्ही कुठेही मनात धरू नका. लोकांनी मतदान केलं. पण ते केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं. आणि अशा प्रकारच्या निवडणुका लढवायच्या असतील तर, निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या, असे राज ठाकरे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;