Maha Kumbh Mela 2025 – भाविकांवर लक्ष देण्याऐवजी व्हिआयपींच्या दिमतीला, चेंगराचेंगरीला प्रशासनच जबाबदार; राहुल गांधींची सडकून टीका

Maha Kumbh Mela 2025 – भाविकांवर लक्ष देण्याऐवजी व्हिआयपींच्या दिमतीला, चेंगराचेंगरीला प्रशासनच जबाबदार; राहुल गांधींची सडकून टीका

उत्तर प्रदेशात प्रागराजमधील महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीवर लोकसभा विरोधी पक्षनेते, काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिला आहे. राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. प्रयागराज महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू झाला आहे आणि अनेकजण जखमी झाले आहे. ही घटना अत्यंत दुःखद आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

प्रयागराजमधील घटना अत्यंत दुःखद आहे. पीडित कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त करतो. आणि जखमींची प्रकृतीत लवकर सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे राहुल गांधी म्हणाले. या दुःखद घटनेला सदोष व्यवस्थापन, अव्यवस्था आणि सामान्य भाविकांऐवजी व्हिआयपींच्या दिमतीला असलेला प्रशासन कारणीभूत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

महाकुंभ अजून बरेच दिवस चालणार आहे. आणखी अनेक महास्नान होणार आहेत. यामुळे अशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी सरकारने व्यवस्थेत सुधारणा करायला हवी. व्हिआयपी कल्चरला लगाम घालावी आणि सामान्य भाविकांच्या गरजांच्या पूर्ततेसाठी उत्तम व्यवस्था करावी, असा सल्ला राहुल गांधी दिला आहे. तसेच काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांनी पीडित कुटुंबांची मदद करावी, अशी सूचनाही राहुल गांधी यांनी दिली आहे.

‘अपुरी व्यवस्था, व्हिआयपींची गर्दी, स्वतःच्या प्रचारावर भर दिल्याने चेंगराचेंगरी’

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही चेंगराचेंगरीच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. खरगे यांनी ट्विट करून केंद्र सरकारसह उत्तर प्रदेशातील भाजपच्या योगी आदित्यनाथ सरकारवर निशाणा साधला आहे. महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरीत होऊन अनेक भाविकांचा मृत्यू आणि अनेकजण जखमी झाल्याची घटना हृदयद्रावक आहे. पीडित कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त करतो. अपूर्ण व्यवस्था, व्हिआयपींची गर्दी, अव्यवस्था आणि स्वतःचा प्रचार करण्यात व्यग्र असल्याने चेंगराचेंगरी घडली. हजारो कोटी रुपये खर्चून अशी सुमार व्यवस्था केली, हे निषेधार्ह आहे, असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;