‘छावा’चा वाद राज ठाकरेंच्या दरबारी; दिग्दर्शक मनसे अध्यक्षांच्या भेटीला

‘छावा’चा वाद राज ठाकरेंच्या दरबारी; दिग्दर्शक मनसे अध्यक्षांच्या भेटीला

‘छावा’ या चित्रपटाचा वाद आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दरबारी गेला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर हे राज ठाकरेंच्या भेटीला गेले आहेत. मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर हेसुद्धा ‘शिवतीर्थ’वर दाखल झाले आहेत. ‘छावा’ या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांना नृत्य करताना दाखवल्याने वाद निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यातील एका दृश्यात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशल लेझीम खेळताना दिसून आला. हा सीन सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काहींनी त्यावरून आक्षेप घेतला. सोशल मीडियावरील प्रतिक्रियांनंतर त्यावरून राजकीय नेत्यांनीही टीका केली. लेझीमचा हा सीन हटवल्याशिवाय चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भूमिका काहींनी घेतली. त्यानंतर आता दिग्दर्शक राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले आहेत.

‘छावा’ या चित्रपटातील लेझीमच्या दृश्यावरून दोन गट पडले आहेत. त्यापैकी एक गट समर्थन करत म्हणतोय की, लेझीमचं दृश्य अजिबात आक्षेपार्ह वाटत नाही. महाराजांची किर्ती सर्वत्र चित्रपटाच्या माध्यमातून पोहोचत असेल तर त्यात आक्षेप का घ्यावा, असं काहीजण म्हणतायत. तर दुसरीकडे छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेला अशा पद्धतीने लेझीम खेळताना दाखवू नये, अशी भूमिका दुसऱ्या गटाने घेतली आहे. अशातच चित्रपटातील हा वादग्रस्त भाग हटवल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.

आता राज ठाकरेंच्या भेटीदरम्यान दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर त्यांची काय बाजू मांडतात आणि मनसेकडून कोणती भूमिका घेण्यात येणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ‘छावा’ या चित्रपटात अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका आहेत. विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराजांच्या, रश्मिका मंदाना ही महाराणी येसुबाई भोसलेंच्या आणि अक्षय खन्ना हा औरंगजेबच्या भूमिकेत आहे. येत्या 14 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट देशभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Maddock Films (@maddockfilms)

“आपण आजवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित अनेक चित्रपट पाहिले आहेत. मात्र छत्रपती संभाजी महाराज हेसुद्धा मोठे योद्धा होते. मराठा साम्राज्य आणि महाराष्ट्रासाठी त्यांचं योगदान काय आहे, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे”, अशी प्रतिक्रिया दिग्दर्शकांनी दिली होती. या चित्रपटाची कथा डॉ. जयसिंगराव पवार यांच्या पुस्तकावर आधारित आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;