हिंजवडीतील बेरोजगार तरुणांना मोदी भजी तळायला सांगणार का? संजय राऊत यांचा सवाल
हिंजवडीत 100 जागांसाठी हजारो तरुण रांगेत उभे होते. या बेरोजदार तरुणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी भजी तळायला सांगणार का असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदर संजय राऊत यांनी उपस्थित केला. तसेच राज्यातील बेरोजगारीसंदर्भात श्वेतपत्रिका काढा अशी मागणीही संजय राऊत यांनी केली.
पुण्यात पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, हिंजवडीतील बेरोजगार तरुणांना पंतप्रधा मोदी भजी तळायला सांगणार का? बेरोजगारीवरून संजय राऊत यांचा सवाल महाराष्ट्रातले हजारो तरुण तरुणी बेरोजगार आहेत. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रोजगार वाढवण्यासाठी दावोसला जाऊन परकीय गुंतवणूक आणत आहेत.
तसेच राज्यातल्या बेरोजगारीसंदर्भात तुम्ही श्वेतपत्रिका काढली पाहिजे. एका हिंजवडीत पाच ते साडे सहा हजार पदवीधर तरुण हे आयटीक्षेत्रात नोकरीसाठी चेंगराचेंगरी करत उभे आहेत. पंतप्रधान मोदी म्हणतात की यांनी भजी तळावी. या साडे पाच हजार तरुणांना भजी तळायला सांगणार का? हिंजवडीतलं हे अत्यंत विदारक चित्र आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List