हिंदुस्थानी कंपन्यांबरोबर करार करायला बर्फाचे कपडे घालून दावोसला जायची गरज काय होती? आदित्य ठाकरे यांचा महायुती सरकारवर हल्ला

हिंदुस्थानी कंपन्यांबरोबर करार करायला बर्फाचे कपडे घालून दावोसला जायची गरज काय होती? आदित्य ठाकरे यांचा महायुती सरकारवर हल्ला

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी दावोस दौऱयातील गुंतवणुकीवरून आज महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला. 15 लाख कोटींचे करार केल्याचा दावा सरकारने केला आहे. पण गुंतवणुकीचा हा नुसताच फुगा असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली. हिंदुस्थानी कंपन्यांबरोबर करार करायला बर्फाचे कपडे घालून दावोसला जायची गरज काय होती? इथेच मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम का नाही घेतला? असा संतप्त सवालही त्यांनी केला.

‘मातोश्री’ निवासस्थानी आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकारच्या दावोस दौऱयातील वस्तुस्थितीवर प्रकाश टाकला. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेही उपस्थित होते. आदित्य ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी एपूण 54 करार केले आहेत. या 54 कंपन्यांमधून 11 विदेशी कंपन्या आहेत, तर हिंदुस्थानी कंपन्या या 43 आहेत. याच 43 मधील 31 पंपन्या या महाराष्ट्रामधील आहेत, अशी आकडेवारीच आदित्य ठाकरे यांनी मांडली. काही कंपन्या तर मुख्यमंत्री कार्यालयाजवळच्या आहेत. मग सामंजस्य करार करण्यासाठी दावोसला जायची गरज काय होती? इथे 20-25 कोटींचा खर्च वाचवून इथेच मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम त्यासाठी घेता आला असता किंवा सह्याद्री अतिथीगृहावरही करार करता आले असते आणि दावोसमधील वेळ आंतरराष्ट्रीय नेते, कंपन्या आणि तेथील उद्योजकांशी संवाद साधण्यासाठी वापरता आला असता, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचे ट्विटर हॅण्डल पाहून असे वाटले की, इतकी गुंतवणूक आली आहे की, जुनी पेन्शन योजना लगेच लागू होईल. लाडक्या बहिणींना 2100 रुपये काय तर, त्यात आणखी एक-दोन शून्य वाढून ती योजना लगेच लागू होईल. दरम्यान, प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्र्यांच्या आधी उद्योगमंत्री पोहचायला हवेत, पण ते मुख्यमंत्री यांच्या नंतर गेले, असा टोलाही त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना लगावला.

नगरविकास खाते दावोसला, मंत्री मात्र रुसून गावी

आदित्य ठाकरे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. अख्खे नगर विकास खाते मुख्यमंत्र्यांसोबत दावोसला गेले होते, पण त्या खात्याचे मंत्री मात्र रुसून गावी जाऊन बसले होते आणि त्याच गँगमधल्या दुसऱया मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी दावोसला नेले, अशी खिल्ली आदित्य ठाकरे यांनी उडवली.

नगरविकास विभागाचे अधिकारी दावोसला गेले होते मग मंत्र्यांना सोबत का नेले नाही, असा चिमटाही त्यांनी काढला. दावोसमध्ये जे करार झाले त्यात जवळपास चार लाख कोटींचे करार हे एमएमआरडीए आणि सिडकोने केले आहेत. एमएमआरडीए आणि सिडको हे खाते नगरविकासमंत्र्यांचे आहे. त्यामुळेच कदाचित नगरविकासमंत्री आपल्या गावी आणि मुख्यमंत्री दावोसच्या गावी, असे झाले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;