“दोन्ही पूर्व पत्नी शिव्या देतील..”; आमिर खानच्या मुलाने सलमानसमोर असं का म्हटलं?

“दोन्ही पूर्व पत्नी शिव्या देतील..”; आमिर खानच्या मुलाने सलमानसमोर असं का म्हटलं?

तब्बल 105 दिवसांनंतर रविवारी ‘बिग बॉस 18’ची सांगता झाली. सलमान खानने ग्रँड फिनालेचं सूत्रसंचालन केलं. तर या एपिसोडमध्ये खास पाहुणे म्हणून अभिनेता आमिर खान, त्याचा मुलगा जुनैद खान आणि अभिनेत्री खुशी कपूर पोहोचले होते. ‘बिग बॉस 18’ ग्रँड फिनालेच्या मंचावर आमिर आणि सलमानने खूप धमाल केली. या दोघांच्या मैत्रीची परीक्षा घेण्यासाठी आमिरच्या मुलाने एक मजेशीर खेळ आयोजित केला. आमिर आणि सलमान यांना एकमेकांचे मोबाइल फोन बदलून एकमेकांच्या फोनमधील मेसेज तपासायला सांगितले. यानंतर जी गंमत झाली, ती पाहण्यासारखी होती.

सुरुवातीला सलमानने त्याचा फोन आमिरच्या हातात देण्यास नकार दिला. “मला हा खेळ खेळायचा नाही”, असं तो म्हणाला. त्यावर आमिरने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सलमान मस्करीत त्याला म्हणतो, “सोड.. तुझं सगळं व्यवस्थित आहे. तू दोन वेळा लग्न केलंस, तुला मुलंबाळं आहेत. माझ्या आयुष्यात यापैकी काहीच नाहीये.” या गमतीशीर संवादानंतर अखेर सलमान त्याचा फोन आमिरच्या हातात देतो आणि त्याचा फोन स्वत:च्या हातात घेतो. आमिरचा फोन तपासताना सलमान त्याला म्हणतो, “तुझी कोणी नवीन गर्लफ्रेंड आहे का?” त्यावर आमिर सांगतो की, “माझा फोन बघ, मग तुला उत्तर मिळेल.”

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

आमिर आणि सलमान एकमेकांचा फोन बघून मस्करी करत असतानाच जुनैदच्या एका वक्तव्याने उपस्थितांमध्ये हशा पिकतो. आमिरचा फोन हातात घेऊन सलमान म्हणतो, “मला तुझ्या फोनमध्ये काय दिसणार आहे? एकतर रिना किंवा किरणच तुला मेसेज करतील.” हे ऐकून आमिरचा मुलगा जुनैद म्हणतो, “मग दोन-दोन पूर्व पत्नींच्या शिव्या तुम्हाला वाचायला मिळतील.” यावर सर्वजण हसू लागतात.

आमिर खानने 1986 मध्ये रिना दत्ताशी लग्न केलं होतं. मात्र 2002 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. जुनैद आणि आयरा ही रिना-आमिरची मुलं आहेत. त्यानंतर 2005 मध्ये आमिरने किरण रावशी लग्न केलं. या दोघांना आझाद हा मुलगा आहे. आमिर आणि किरण यांनी 2021 मध्ये घटस्फोट घेतला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;