खंडणी प्रकरणातील अवादा कंपनीच्या कर्मचाऱ्याचा धक्कादायक मृत्यू, पोलिसांनी दिली घटनेची माहिती

खंडणी प्रकरणातील अवादा कंपनीच्या कर्मचाऱ्याचा धक्कादायक मृत्यू, पोलिसांनी दिली घटनेची माहिती

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणी प्रकरणी वाल्मीक कराड अटकेत आहे. आता याच प्रकरणाशी संबंधित एक नवीन माहिती समोर आली आहे. वाल्मीक कराड आणि त्याच्या साथीदारांनी खंडणी मागितल्याचा आरोप असलेल्या आवादा कंपनीच्या कामगाराचा केज येथे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रचपाल हमीद मसीह, असं या मृत कामगारांचे नाव असून तो पंजाबमधील गुरुदासपूर येथील रहिवासी आहे.

रचपाल हमीद मसीह मृत्यू नेमका कशामुळे झाला? असे प्रश्न आता विचारले जात आहेत. याचाच खुलासा पोलिसांनी केला आहे. रचपाल याचा मृत्यू साप चावल्याने झाला, अशी माहिती बीड एसपी नवनीत कावंत यांनी दिली आहे. मात्र ही प्राथमिक माहिती असल्याचं सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. खंडणी प्रकरणाशी याचा काही संबंध आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;