मोहन भागवत यांचं विधान देशद्रोही, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा घणाघात

मोहन भागवत यांचं विधान देशद्रोही, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा घणाघात

राम मंदिर झाल्यानंतर देशाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले असे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले होते. हे विधान म्हणजे प्रत्येक भारतीयाच अपमान आहे आणि हे विधान देशद्रोही आहे अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले.

दिल्लीत इंदिरा भवनचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी राहुल गांधी म्हणाले की, सरसंघचालक मोहन भागवत दर दोन तीन दिवसांनी काही तरी विधानं करतात. या विधानातून त्यांना भारताच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनाबाबत आणि संविधानाबाबत काय वाटतं हे कळतं.

तसेच काल भागवतांनी जे विधान केलं ते देशद्रोही विधान आहे. स्वातंत्र्य आंदोलन आणि संविधान अमान्य आहे असा त्यांच्या विधानाचा अर्थ होते. हेच विधान दुसऱ्या एका देशात कुणी केलं असतं तर त्यांना अटक केली असती आणि त्यांच्यावर खटला चालवला असता. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले नाही असे म्हणणे हा प्रत्येक भारतीयाचा अपमान आहे. वेळ आली आहे की अशा बकवास गोष्टी ऐकणं आपण बंद केले पाहिजे. कारण त्यांना वाटतं की लोक फक्त ओरडत राहतील असेही गांधी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;