मोदींचा दौरा, व्हीआयपीमुळे मुंबईकरांना त्रास का? आदित्य ठाकरे यांचा सवाल

मोदींचा दौरा, व्हीआयपीमुळे मुंबईकरांना त्रास का? आदित्य ठाकरे यांचा सवाल

पंतप्रधान मुंबई भेटीवर येणार असल्याने अनेक ठिकाणी वाहतूक बंद ठेवल्याने मुंबईकरांची कोंडी झाली आहे. एखादा व्हीआयपी मुंबईत आला म्हणून त्याचा मुंबईकरांना त्रास का असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.

एक्सवर पोस्ट करून आदित्य ठाकरे म्हणाले की, कामाला जाण्याच्या दिवशीच मुंबईतले ट्रॅफिक अडवून ठेवलं जातंय. पश्चिम द्रुतगती मार्गावरून लोक ऑफिसला जातात. पण ट्रॅफिक जॅममुळे लाखो लोक अडकले आहेत. व्हीआयपी आल्यामुळे 20 मिनिटं ट्रॅफिक अडवून ठेवलं जातं. ज्या कार्यक्रमाला व्हीआयपी येतात ते कार्यक्रम शनिवारी किंवा रविवारी का घेत नाहीत? हे कार्यक्रम कामाच्या दिवशी का ठेवले जातात? इलेक्शनच्या काळात जसं हेलिकॉप्टर वापरतात तसे का नाही वापरत? एखादा व्हीआयपी आला तर त्याचा त्रास मुंबईकरांनी का सहन करायचा? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;