Champions Trophy मध्ये दमदार कामगिरी करा अन्यथा…; BCCI च्या आढावा बैठकीत मोठा निर्णय

Champions Trophy मध्ये दमदार कामगिरी करा अन्यथा…; BCCI च्या आढावा बैठकीत मोठा निर्णय

टीम इंडियाचे गेल्या काही महिन्यांमध्ये कसोटी क्रिकेटमधील प्रदर्शन अत्यंत निराशाजनक राहिले आहे. न्यूझीलंडने घरच्या मैदानावर दिलेला वाईटव्हॉश त्यानंतर 10 वर्षांनी टीम इंडियाने बॉर्डर गावस्कर करंडक गमावला. त्यामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (WTC) पोहोचण्याचे टीम इंडियाचे स्वप्न धुळीस मिळाले. टीम इंडियाच्या खराब प्रदर्शनामुळे BCCI खडबडून जागी झाली असून कर्णधार रोहित शर्मा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये रोहित आणि विराटच्या भविष्या संदर्भात चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.

कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन्ही वरिष्ठ खेळाडूंच्या खराब कामगिरीचा टीम इंडियाला जोरदार फटका बसला आहे. खराब कामगिरीमुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका सुद्दा झाली. तसेच टीम इंडियाचे प्रदर्शनही मागील काही महिन्यांपासून अत्यंत खराब राहिले आहे. त्यामुळे BCCI ने कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या उपस्थिती मुंबईमध्ये 11 जानेवारी रोजी आढावा बैठक घेतली होती. दोन तास चाललेल्या या बैठकीमध्ये टीम इंडियाची वर्तमान कामगिरी आणि भविष्यात कशा पद्धतीने निर्णय घ्यायचे यावर चर्चा झाली.

बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, आता सध्या काहीही होणार नाही, परंतु चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर कर्णधारपदाबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. जर टीम इंडियाचे प्रदर्शन आहे तसेच राहिले तर कर्णधारा पदाबाबात हालचाल होऊ शकते. त्याच बरोबर विराट कोहलीने सुद्दा धावा करने गरजेचे असल्याचे संघ व्यवस्थापनाचे म्हणने आहे. परंतु दोघांनाही कसोटीमधून वगळण्याचा सध्या विचार नाही. सर्व काही चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये खेळाडूंच्या प्रदर्शनावर अवलंबून आहे. तसेच खेळाडू द्विपक्षीय मालिका आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभागी होत नसल्याने संघ व्यवस्थापन नाराज आहे, त्यामुळे जे खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभागी होणार नाहीत. अशा खेळाडूंची निवड करण्यात येणार नाही, असा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. आज तक या वृत्तवाहिनीने या संदर्भात वृत्त दिले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;