सरकारचा जावई असल्यासारखं वाल्मीकला वागवलं जातंय – अंजली दमानिया

सरकारचा जावई असल्यासारखं वाल्मीकला वागवलं जातंय – अंजली दमानिया

‘सरकारचा जावई असल्यासारखं वाल्मिकला वागवलं जातंय’, असं म्हणत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिय यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सात आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. मात्र वाल्मीकी कराड याच्यावर मकोका लावण्यात आला नाही. यावरच भाष्य करताना ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत त्या असं म्हणाल्या आहेत.

अंजली दमानिया म्हणाल्या की, ”सात आरोपींवर आज मकोका लावून कुठला तिर मारला या शासनाने? हे सगळं प्रकरण पहिल्या दिवसापासून अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. या सात जणांनी संतोष देशमुख यांना मारहाण करत त्यांची हत्या केली. मात्र त्यांच्या मागे आणखी एक व्यक्ती होता, जो व्हिडीओ बनवून हे सगळं बघत होता. या सात जणांवर मकोका लावण्यात आला, मात्र आठव्याला (वाल्मीकी कराड) यातून का वगळण्यात आलं? कारण त्याच्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात राजकीय वरदहस्त आहे की, त्याच्यावर कारवाई करण्याची शासन आणि गृहमंत्रालयाची हिम्मत नाही आहे.

अंजली दमानिया पुढे म्हणाल्या की, ”हे सगळं प्रकरण समजून घ्यायचं असेल तर, शिंदे नावाचे एक अधिकारी होते, जे अवादा या कंपनीसाठी काम करत होते. त्यांनी मे महिन्यापासून तक्रार केली होती की, त्यांना धमकी दिली जात आहे. त्यांना वारंवार तुमचे प्लांट बंद करा म्हणून धमकी दिली जात होती. त्यांना हातपाय तोडण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात येत होती. याशिवाय एकदा त्यांचं अपहरणही करण्यात आलं होतं. याशी संबंधित एक एफआयर देखील आहे. यातच मे महिन्यापासून वाल्मीकी कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांची नावे येत होती, मग त्यावेळी त्यांच्यावर मकोका लावून कारवाई का करण्यात आली नाही? मे महिन्यापासून डिसेंबरपर्यंत पोलिसांनी वेळ वाया घालवला नसता तर, आज संतोष देशमुख जिवंत असते. ”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;