हवामान बदलाच्या समस्येबाबत आपण जागरूक नाही, आदित्य ठाकरे यांचे मत

हवामान बदलाच्या समस्येबाबत आपण जागरूक नाही, आदित्य ठाकरे यांचे मत

2024 हे आतापर्यंत सर्वाधिक तापमान असलेले वर्ष होते, असा अहवाल कोपर्निकस क्लायमेट चेंज संस्थेने दिला आहे. हवामान बदलामुळे भारतातही समस्या निर्माण होते, असे मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करून आदित्य ठाकरे म्हणाले की, हवामान बदलाचा फटका आपल्या सगळ्यांना बसतोय, तरी या समस्येबाबत आपण अद्याप जागरूक नाही आहोत. भारतात आपल्या शहरांमध्ये शाळा, घर, ऑफिसेस तसेच ग्रामीण भागात शेतीवर वातावरण बदलामुळे मोठ्या फटका बसतोय. हवामान बदलाची समस्या आपण पूर्णपणे समजू शकलेलो नाही. हवामान बदलामुळे पूर, दुष्काळ आणि भुस्खलनासारख्या घटना घडत आहेत आणि त्यामुळे स्थलांतर होत आहे. आणि स्थलांतरामुळे राजकीय आणि सामाजिक संकटंही निर्माण होत आहे. एक व्यक्ती म्हणून आपण या समस्येशी नाही लढू शकत. सरकार आणि कॉर्पोरेट संस्थांनी यावर कठोर पाऊल उचलणे गरजेचे आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;