तुझी मस्ती जिरवल्याशिवाय राहणार नाही; मनोज जरांगे यांचा पुन्हा धनंजय मुंडेंना इशारा

तुझी मस्ती जिरवल्याशिवाय राहणार नाही; मनोज जरांगे यांचा पुन्हा धनंजय मुंडेंना इशारा

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येचा आणि सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बोलताना मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना लक्ष्य केलं.तसेच जर तुम्ही असाच त्रास देत राहिलात, तर मराठ्यांना उठाव करावा लागेल. आम्ही तुझी मस्ती जिरवल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंना दिला आहे.

हा मनोज जरांगे भीत नसतो. तुझ्या गुंडांना शांत कर. जर तुझ्यामुळे मराठा, दलित मुस्लिम ओबीसीला त्रास झाला तर 25 जानेवारीनंतर तुझी मस्ती जिरवल्याशिवाय शांत बसणार नाही. तुझी टोळी थांबाव, ही धमकी नाही, तर तुला सावध करतोय. हे थांबलं नाही तर तुझी मस्ती जिरवल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना दिला आहे.

आम्ही कधीच कोणाच्याच जातीवर बोललो नाही, आम्ही कायम गुंडावर बोललोय आणि बोलत राहणार. राज्याला मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला म्हणून मराठा शांत आहे. देशमुख कुटुंबावर कोणी बोलेल तर त्या गुंडांचा बंदोबस्त आम्ही करू. धाराशिवमध्ये पोलीस अधिकारी यांच्या तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला. मुख्यमंत्री साहेब सरकार म्हणून आम्ही तुमच्यावर थुंकतो. बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक करा, त्यांना सरकारी वकील द्या, जन्मठेप होत नाही तोपर्यंत त्याची सुटका होता कामा नये. सर्व आमदारांनी या लेकीला न्याय द्या, हे सुटले तर तुमच्या मागे मी लागेल असेही मनोज जरांगे म्हणाले. केजमध्ये पोरीला मारून टाकले, धन्या मुंडे यांच्या कार्यकर्त्यांचे हे प्रताप आहेत. मी कधी त्यांचं नाव घेत नाही. मात्र धनंजय देशमुख यांना धमकी दिल्यानंतर मी नाव घेतलं. यांनी टोळ्या पाळल्या आहेत. यांनी लोकं मारायचं ठरवलं आहे. यांना जातीशी देणेघेणे नाही. कोणावर हल्ला करायची गरज नाही, मात्र प्रत्युत्तर दिल्याशिवाय शांत बसायचं नाही. तुमच्या कुटुंबाचे तुम्हाला रक्षण करावं लागणार आहे. यांना थांबवायचं नसेल तर आपला ना इलाज आहे, हे फक्त मुठभर लोकं आहेत. त्यांचा आपल्याला बंदोबस्त करावा लागेल, असेही जरांगे म्हणाले.

काळ धावून आला आहे, काळ संपवायचा असेत तर धनंजय मुंडे त्याचं पाप झकण्यासाठी ओबीसींचे पांघरून घेत आहे. यात ओबीसी चा काय संबंध आहे? वंजारी, धनगर, दलित कोणाला बोललो नाही, गुंडांना बोलायचं नाही का? तुम्ही त्रास देत राहिलात तर मराठ्यांना उठाव करावा लागेल असेही मनोज जरांगे म्हणाले. नांदेडचा बिहार होऊ द्यायचा नाही. नांदेड जिल्ह्याचा पालकमंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना करू नये, अशी मागणी नांदेड येथील सकल मराठा समाजाने केली आहे. वाल्मीक कराडची नार्को टेस्ट करून त्यांची चौकशी करावी, वाल्मीक कराडचा बॉस धनंजय मुंडे आहेत. तसेच मुंडे यांनी नैतिक जवाबदारी समजून राजीनामा द्यावा, अशी सर्व समाजबांधवांची मागणी आहे, असेही जरांगे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;