अखेर अल्लू अर्जुनने चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या मुलाची घेतली भेट; पहा व्हिडीओ

अखेर अल्लू अर्जुनने चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या मुलाची घेतली भेट; पहा व्हिडीओ

हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2: द रूल’ या चित्रपटाच्या प्रिमिअरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एम. रेवती या महिलेचा मृत्यू झाला. तर त्यांचा नऊ वर्षांचा मुलगा श्रीतेजा अजूनही रुग्णालयात दाखल आहे. घटनेच्या जवळपास महिनाभरानंतर मंगळवारी अभिनेता अल्लू अर्जुनने रुग्णालयात मुलाची भेट घेतली. कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (KIMS) याठिकाणी श्रीतेजावर उपचार सुरू आहेत. 4 डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’च्या प्रीमिअरचं आयोजन करण्यात आलं होतं. याठिकाणी अल्लू अर्जुन पोहोचताच चेंगराचेंगरी झाली. या चेंगरीचेंगरीत रेवती यांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला होता. त्यांचा मुलगा श्रीतेजा अद्याप शुद्धीवर आला नाही.

संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती. स्थानिक कोर्टाने त्याची जामिनावर सुटका केली आहे. दरम्यान श्रीतेजाला शुद्धीवर येण्यास वेळ लागत असून उपचारांना तो हळू हळू प्रतिसाद देत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. अर्जुनच्या भेटीनंतर मुलावर उपचार करणारे डॉ. चेतन मुंदडा आणि डॉ. विष्णू तेज पुडी म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून त्याचा ताप कमी असून त्याला अँटिबायोटिक्स देणंही थांबवलं आहे. नाकाद्वारे त्याला अन्न दिलं जात असून इतर सहाय्यक उपचारही सुरू आहेत. मधे मधे तो डोळे उघडतो आणि अचानक रडतो.”

अल्लू अर्जुनने रुग्णालयात जवळपास दहा मिनिटांपर्यंत मुलाच्या वडिलांशी संवाद साधला. यावेळी त्याने मुलाच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली आणि पत्नी रेवती यांच्या मृत्यूप्रकरणी शोक व्यक्त केला. मुलाकडून उपचारांना हळूहळू प्रतिसाद मिळत असल्याची माहिती भास्कर यांनी अल्लू अर्जुनला दिला. यावेळी अर्जुनने सर्वतोपरी मदत पुरवण्याचं आश्वाासन भास्कर यांना दिलं. अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 1’ हा चित्रपट पाहिल्यानंतर श्रीतेजा त्याचा चाहता झाल्याचं भास्कर यांनी सांगितलं. अनेकदा तो घरात ‘पुष्पा द फायर’ असा डायलॉग म्हणत त्याची नक्कल करून दाखवायचा, असंही ते म्हणाले. अल्लू अर्जुनने रुग्णालयात भेट दिली, तेव्हासुद्धा श्रीतेजा बेशुद्धच होता.

संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीत झालेल्या महिलेच्या मृत्यूप्रकरणी अल्लू अर्जुनला 13 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर 14 डिसेंबरला त्याला जामीन मिळाला. या घटनेनंतर पोलीस विभाग आणि तेलंगणा सरकार यांनी अल्लू अर्जुनवर विविध आरोप केले आहेत. अल्लू अर्जुन बेजबाबदारपणे वागला, असा आरोप त्याच्यावर करण्यात आला असून त्याने हे आरोप फेटाळले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;