भाजपवर तीन संकटं आली, पंतप्रधान मोदींच्या टीकेवर अरविंद केजरीवाल यांचे प्रत्युत्तर

भाजपवर तीन संकटं आली, पंतप्रधान मोदींच्या टीकेवर अरविंद केजरीवाल यांचे प्रत्युत्तर

दिल्लीत विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. त्यापूर्वीच दिल्लीत राजकारण तापले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झोपडपट्टीत राहणाऱ्या 1 हजार 675 कुटुबीयांना स्वाभिमान फ्लॅट्सच्या चाव्या दिल्या. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी आप सरकारव टीका केली होती. आता केजरीवाल यांनी मोदी यांना प्रत्युत्तर दिले आहे.

केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटले की मोदी यांनी 43 मिनिट भाषण केलं, त्यापैकी 39 मिनिटं फक्त दिल्लीचे लोक आणि त्यांनी निवडून दिलेल्या सरकारवर टीका केली. 2015 साली दिल्लीच्या जनतेने दोन सरकारं निवडून दिली होती. दिल्ली हे स्वायत्त राज्य नाही, दिल्लीची जनता ही दोन सरकारं निवडून देता. काही मुद्दे हे एका सरकारच्या अंतर्गत येतात तर काही मुद्दे दुसऱ्या सरकारच्या अंतर्गत येतात.

केजरीवाल म्हणाले की दिल्लीच्या सरकारने दोन सरकारं निवडून देली होती. केंद्रात भाजपचे आणि दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार निवडून दिले. या गोष्टीला 10 वर्ष पूर्ण झाले. या दहा वर्षात आप सरकारने भरपूर काम केले. पण आपलं जे दूसरं सरकार आहे भाजपचं केंद्र सरकार त्यांनी गेल्या 10 वर्षात एकही असे काम केले नाही की पंतप्रधा मोदी आपल्या 43 मिनिटांच्या भाषणात सांगू शकतील.

केजरीवाल म्हणाले की आज पंतप्रधान मोदींनी सांगितले की दिल्लीत संकट आले आहे. पण संकट दिल्लीवर नाही तर भाजपवर आले आहे. पहिले संकट हे भाजपकडे दिल्लीसाठी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नाही. दुसरे संकट की दिल्लीत निवडणूक लढवण्यासाठी भाजपकडे मुद्दे नाहीत. आणि तिसरे संकट हे की भाजपकडे अजेंडा नाही. आम्ही फक्त दिल्लीच्या नागरिकांचा फायदा बघतोय. जर केंद्र सरकारच्या योजनेमुळे दिल्लीकरांचे कल्याण होत असेल तर आम्ही करू, जर आमच्या योजनेमुळे जनतेला फायदा होत असेल तर तो करू, तुमची योजना आमची योजना असा भेद आम्ही करत नाही असेही केजरीवाल म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;