बुआजींनी ‘द कपिल शर्मा शो’ का सोडला ? उपासना सिंग यांनी सांगितलं कारण; माझ्या पंचलाईन्स..

बुआजींनी ‘द कपिल शर्मा शो’ का सोडला ? उपासना सिंग यांनी सांगितलं कारण; माझ्या पंचलाईन्स..

भन्नाट कॉमिक टायमिंग आणि पंचलाइन्समुळे प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री उपासना सिंग बऱ्याच काळापासून टीव्ही जगतापासून दूर आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्या गायबच आहेत. आजही प्रेक्षक त्यांना ‘द कपिल शर्मा शो’मध्ये मिस करतात. ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’मध्ये त्याने एक आयकॉनिक भूमिका साकारली होती. पण आता सध्या त्या पंजाबी चित्रपटांमध्ये काम करताना दिसत आहेत. त्यांचं स्वतःचं प्रॉडक्शन हाऊसही उघडले आहे. ज्याद्वारे उपासना यांनी आतापर्यंत इंडस्ट्रीत आपले एक विशेष स्थान निर्माण केले आहे.

कपिल शर्मा शो का सोडला ?, उपासना यांनी सांगितलं कारण

उपासना सिंह या नुकत्याच सिद्धार्थ काननच्या पॉडकास्टवर आल्या होत्या. तेथे गप्पा मारताना त्यांनी कपिलच्या शोला अलविदा करण्याचे खरे कारण सांगितले. जेव्हा उपासना यांनी कपिलचा शो सोडला तेव्हा त्यांनी स्वतःला टीव्हीच्या जगापासून दूर केले. शोमध्ये घालवलेल्या त्या वेळेबद्दल उपासना भरभरून बोलल्या – जवळपास अडीच वर्ष आमचा शो हा टॉपला होता, पण माझ्या आयुष्यात एक वेळ अशी आली की माझ्याकडे नवं असं करण्यासारखं काहीच नव्हतं. मी कपिलशी देखील याबद्दल बोलले होते.

” आमच्या दोघांचाही बाँड अतिशय चांगला आहे. आमच्यात कधीच कोणताही वाद, किंवा भांडणं झालं नाही, पण लोकांना तसं का वाटलं काही कल्पना नाही. माझा रोल आता काही वेगळा वाटत नाहीये,असं मी कपलिला म्हणाले होते. मी जे काम करत होते, त्यामध्ये मला (काहीच) मजा येत नव्हती. माझ्या भूमिकेकडे थोडं तरी लक्ष द्या, असं मी त्याला बोलले ” असं उपासना सिंग यांनी सांगितलं.

” माझ्या हातातून सगळ्याच गोष्टी निसटत चालल्या होत्या, कारण कॉन्ट्रॅक्टबद्दल चर्चा सुरू होती. चॅनेलमध्येही सगळं काही आलबेल नव्हतं. त्यामुळे गोष्टी आणखीनच कठीण झाल्या,” असं उपासना म्हणाल्या. “माझं कॉन्ट्रॅक्ट रपिलसोबत नव्हत,चॅनेलसोबत होतं. ते लोक जेव्हा दुसऱ्या चॅनेलसोबत गेले, तेव्हा मी त्यांच्यासोबत जाऊ शकले नाही. टीममध्येही टेन्शन होतं, मला कम्फर्टेबल वाटत नव्हतं. कृष्णा अभिषेकसोबत मी जेव्हा दुसरं चॅनेल जॉईन ला तेव्हा, कॉन्ट्रॅक्ट संपेपर्यंत मला तिथेच थांबावं लागलं” , असं त्यांनी नमूद केलं.

उपासना पुढे म्हाल्या की, : या काळात मी क्रिएटिव्ह टीमसोबत काही गोष्टींचाही सामना केला. ते माझ्या पंचलाईन कापायचे. प्रेक्षक हसतील तिथेच ते माझ्या ओळी काढतील हे मला माहीत होतं. मला टॉर्चर वाटत होतं, अली असगर लाही सेम इश्यू सहन करावा लागला, क्रिएटिव्ह लेव्हलवर आम्ही समाधानी नव्हतो” , असा अनुभव उपासना यांनी सांगितला.

कपिलसोबत कसं होतं बाँडिंग ?

मात्र, कपिल शर्माने नंतर उपासना सिंह यांना शोमध्ये परतण्याची ऑफर दिली, पण तोपर्यंत अभिनेत्रीचे फोकस दुसरीकडे होता. तेव्हा मी दोन पंजाबी चित्रपटांची निर्मिती केली होती. त्या चित्रपटांमध्ये कपिलने व्हॉईसओव्हरही दिला होता, असं उपासना यांनी तेव्हा सांगितलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;