दाऊदला फरफटत आणणार होते, वाल्या कराडला आणायला हरकत काय? जितेंद्र आव्हाड यांचा सरकारला सवाल

दाऊदला फरफटत आणणार होते, वाल्या कराडला आणायला हरकत काय? जितेंद्र आव्हाड यांचा सरकारला सवाल

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आज आज 22 दिवस झाले आहेत. असं असलं तरी अद्यापही काही आरोपीना अटक करण्यात आलेली नाही. यावरूनच आता विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. यातच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

तुम्ही (महायुती सरकार) दाऊदला फरफटत आणणार होते, मग वाल्या कराडला आणायला काय हरकत आहे? असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे. ते म्हणाले आहेत की, तुम्ही वाल्या कराडला आणू शकत नाही, तुम्ही दाऊदपर्यंत काय पोहोचणार. मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत ते असं म्हणाले.

वाल्मिकी कराड गेल्या अनेक दिवसांपासून फरार. त्याला अटक करण्यात पोलिसांना अद्यापही यश आलं नाही. याच मुद्द्यावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ”पॉलिटिकल अंडरस्टँडिंग असल्या शिवाय हे सगळं घडत नाही. अजूनपर्यंत मी खुणांची मालिका सांगितली आहे. त्यांच्या कोणालाही आजपर्यंत चौकशीसाठी बोलावलं नाही.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;