WTC Final – टीम इंडियासाठी पाचवी कसोटी ‘करो या मरो’ ची; अंतिम फेरी गाठण्यासाठी श्रीलंकेचा विजयही आवश्यक

WTC Final – टीम इंडियासाठी पाचवी कसोटी ‘करो या मरो’ ची; अंतिम फेरी गाठण्यासाठी श्रीलंकेचा विजयही आवश्यक

मेलबर्न कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 184 धावांनी पराभव केला. त्यामुळे टीम इंडियाचे जगातिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचणे आता अवघड झाले आहे. जर टीम इंडियाला WTC फायनलमध्ये पोहचायचे असेल, तर पाचव्या कसोटी सामन्यात कोणत्याही परिस्थितीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करावा लागणार आहे. त्याच बरोबर श्रीलंकेच्या विजयही टीम इंडियासाठी गरजेचा आहे.

बॉर्डर-गावस्कर करंडकातील शेवटचा सामना 3 जानेवारी पासून सिडनी क्रिकेट मैदनावर सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलिया हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्यासाठी प्रयत्नशील असेल. परंतु टीम इंडियाला हा सामना जिंकणे अनिवार्य आहे. टीम इंडियाला जर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहचायचे असेल, तर ऑस्ट्रेलियाला कोणत्याही परिस्थितीमध्ये पराभूत करावे लागणार आहे. त्याच बरोबर श्रीलंकेच्या विजयासाठी देवाकडे साकडे घालावे लागणार आहे. कारण श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेत श्रीलंकेने 2-0 अशा फरकाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला तर, टीम इंडिया WTC फायनलमध्ये पोहचू शकते. पण जर सिडनी कसोटीमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला किंवा सामना अनिर्णित सुटला, तर टीम इंडिया WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर फेकली जाईल. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा फायनलचा थरार 11 ते 15 जून या दरम्यान क्रिकेटची पंढरी लॉर्ड्समध्ये रंगणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;